शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस!

By admin | Updated: July 16, 2015 21:29 IST

१,८४० अर्ज दाखल : अमावस्या संपताच तहसील कचेऱ्यांत गर्दी

सातारा : जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक आणि १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय परिस्थिती चांगलीच ढवळून निघाली आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेली अमावस्या गुरुवारी सकाळी संपल्यानंतर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वेगाने सुरू झाली. गुरुवारी एका दिवसात विक्रमी १,८४० उमेदवारी अर्ज जिल्हाभरात दाखल झाले. राजकीय क्षेत्रात मुहूर्ताला मोठे महत्त्व आहे. अमावस्येला उमेदवारी अर्ज भरल्यास ते अडचणीचे ठरू शकते, असा सार्वत्रिक समज आहे. किंबहुना राजकीय क्षेत्रात हा समज जास्त असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीवरून समोर आले. गुरुवारी अमावस्या संपली आणि गावागावांतील गटातटाची मंडळी गुरुवारी मोठ्या संख्येने तालुक्याच्या गावांत जाऊन धडकली. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारअखेर जिल्हाभरात २ हजार ८६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २० जुलैअखेर आणखी उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने राजकीय रंगत वाढली आहे. गुरुवारी तालुकानिहाय दाखल झालेल्या अर्जांची आकडेवारी अशी : फलटण : २१८, जावळी : १०३, सातारा : ६८, कोरेगाव : १२६, कऱ्हाड : ५०५, पाटण : २०१, वाई : १०७, महाबळेश्वर : ४६, खंडाळा : ११२, खटाव : ११३, माण : १३६, एकूण : १,८४०. जिल्ह्याच्या पारांवर राजकीय चर्चांना ऊत आला आहे. (प्रतिनिधी)निवडणूक याद्यांनी घरे फोडलीग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार असलेल्या मतदार याद्यांमध्ये फारच मजेशीर प्रकार पाहायला मिळत आहेत. एकाच घरातील मते वेगवेगळ्या ठिकाणी फुटली आहेत. विशेष म्हणजे, पतीचे नाव जर वॉर्ड १ मध्ये असेल, तर पत्नीचे नाव वॉर्ड २ मध्ये घातले गेले आहे. अनेक मृत लोकांची नावेही मतदार यादीत आलेली आहेत. सदोष मतदार याद्यांमुळे उमेदवारांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे.