शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचा लाभ सोडावा : सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

औंध : ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी रेशनकार्डधारकांनी स्वतःहून अन्नसुरक्षा अनुदान योजनेतून मिळणाऱ्या धान्याचा लाभ सोडावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी शैलेश ...

औंध : ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी रेशनकार्डधारकांनी स्वतःहून अन्नसुरक्षा अनुदान योजनेतून मिळणाऱ्या धान्याचा लाभ सोडावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले. औंध येथील यशवंत सुकटे यांच्या स्वस्त धान्य भेटीनंतर ग्राहकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी तालुका पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, पुरवठा निरीक्षक आनंद शिंदे, नितीन सुकटे, सतीश देशमुख, प्रकाश आमले, दीपक कुंभार, बंडा हिंगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले, ‘अनेक गरजू रेशनकार्डधारक आजही रेशनपासून वंचित आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखरच पीएचएच योजनेची गरज नाही. त्यांनी स्वेच्छेने या योजनेतून स्वत:हून बाहेर पडावे. गरजू व आवश्यक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अनेक ग्राहकांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊ, अशी ग्वाही प्रांताधिकारी सूर्यवंशी यांना दिली.

यावेळी यशवंत सुकटे यांच्या धान्य दुकानाची दप्तर तपासणी करून सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवल्याबद्दल प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त करून खटाव-माण तालुक्यातील धान्य दुकानांची यापुढे नियमित तपासणी करणार असल्याचे सांगून सर्व धान्य दुकानदार, महसूल विभागातील अधिकारी, पुरवठा शाखेतील अधिकारी यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून आवश्यक गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त धान्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे.