शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

गोविंदा मंडळांना प्रतीक्षा मुलींच्या संघाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, ...

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याल फोडण्याचा प्रयत्न तरुणांचे गोविंदा पथक करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एकमेकांच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत, थरांवर थर लावून हंडी फोडतात.

गोविंदांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात गोपिका पथकांचे अस्तित्वचे नाही. याला सुरक्षितता हे सर्वाधिक मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे या गर्दीत काही अपप्रकार होत असल्याने, कुटुंबातूनच मुलींना यात सहभागी होण्यास अडविले जाते. याबरोबरच दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या मनोऱ्यावरून पडून अपघात होणे आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असं काही मुलींच्या बाबतीत होऊ नये, या काळजीनेही त्यांना या उत्सवात सहभागी होण्यास मज्जाव केला जातो.

कोट :

गोपिका पथकात मुलींना सहभागी होऊ द्यायला मोजकेच पालक तयार होतात. एका पथकात किमान १५ युवतींचा सहभाग असणं आवश्यक आहे, पण अपघात आणि असभ्य व्यवहार होईल, या भीतीने पालकच त्यांना पथकात येऊ देत नाहीत. दहीहंडी आपला पारंपरिक उत्सव असून, त्यात सहभागी होण्यासाठी तरुणींसह त्यांच्या पालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

- स्मिता देशमुख, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष, सातारा.

चौकट :

अनेकदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे गोविंदा पथक थरावरून कोसळून जखमी होतात. हा प्रसंग फोडणाऱ्याच्या जीवावरही बेतू शकतो. २०१२ साली सुमारे २२५ गोविंदा जखमी झाले होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम तयार केले आहेत. २०१४ मध्ये राज्य शासनाने १२ वर्षांखालील मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये, असे फर्मान काढले. यानंतर, उच्च न्यायालयाने दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंद १८ वर्षे पूर्ण झालेला पाहिजे, असे नमूद केले. २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. थरांवरच्या उंचीबाबतही आधी न्यायालयाने निर्बंध घातले होते, पण २०१७ मध्ये ते शिथिल करण्यात आले.

असा रचला जातो मनोरा..!

उंचीवर बांधलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी मानवी मनोरा तयार करावा लागतो. या मनोऱ्याचा पाया रचण्यासाठी दणकट व्यक्तिंची गरज असते. खालच्या थरात उभे असणाऱ्यांच्या मांडी आणि खांद्यावर पाय ठेऊन वरचा थर रचला जातो. थर जसा वरवर जाईल, तसे कमी वजनाचे गोविंदा उंचीवर चढू लागतात. खालच्या थरात असणारे गोविंदा एकमेकांच्या खांद्याला पकडून थर राखत असतात. यात कोणाचाही पाय लटपटला किंवा वरती जाताना हात निसटला, तर अख्खा थर खाली कोसळण्याची भीती असते, ही खबरदारी घेऊन मगच थर रचला जातो.

- प्रगती जाधव-पाटील