शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा मंडळांना प्रतीक्षा मुलींच्या संघाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, ...

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजेशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याल फोडण्याचा प्रयत्न तरुणांचे गोविंदा पथक करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एकमेकांच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत, थरांवर थर लावून हंडी फोडतात.

गोविंदांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात गोपिका पथकांचे अस्तित्वचे नाही. याला सुरक्षितता हे सर्वाधिक मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे या गर्दीत काही अपप्रकार होत असल्याने, कुटुंबातूनच मुलींना यात सहभागी होण्यास अडविले जाते. याबरोबरच दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या मनोऱ्यावरून पडून अपघात होणे आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असं काही मुलींच्या बाबतीत होऊ नये, या काळजीनेही त्यांना या उत्सवात सहभागी होण्यास मज्जाव केला जातो.

कोट :

गोपिका पथकात मुलींना सहभागी होऊ द्यायला मोजकेच पालक तयार होतात. एका पथकात किमान १५ युवतींचा सहभाग असणं आवश्यक आहे, पण अपघात आणि असभ्य व्यवहार होईल, या भीतीने पालकच त्यांना पथकात येऊ देत नाहीत. दहीहंडी आपला पारंपरिक उत्सव असून, त्यात सहभागी होण्यासाठी तरुणींसह त्यांच्या पालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

- स्मिता देशमुख, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष, सातारा.

चौकट :

अनेकदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे गोविंदा पथक थरावरून कोसळून जखमी होतात. हा प्रसंग फोडणाऱ्याच्या जीवावरही बेतू शकतो. २०१२ साली सुमारे २२५ गोविंदा जखमी झाले होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम तयार केले आहेत. २०१४ मध्ये राज्य शासनाने १२ वर्षांखालील मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये, असे फर्मान काढले. यानंतर, उच्च न्यायालयाने दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंद १८ वर्षे पूर्ण झालेला पाहिजे, असे नमूद केले. २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. थरांवरच्या उंचीबाबतही आधी न्यायालयाने निर्बंध घातले होते, पण २०१७ मध्ये ते शिथिल करण्यात आले.

असा रचला जातो मनोरा..!

उंचीवर बांधलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी मानवी मनोरा तयार करावा लागतो. या मनोऱ्याचा पाया रचण्यासाठी दणकट व्यक्तिंची गरज असते. खालच्या थरात उभे असणाऱ्यांच्या मांडी आणि खांद्यावर पाय ठेऊन वरचा थर रचला जातो. थर जसा वरवर जाईल, तसे कमी वजनाचे गोविंदा उंचीवर चढू लागतात. खालच्या थरात असणारे गोविंदा एकमेकांच्या खांद्याला पकडून थर राखत असतात. यात कोणाचाही पाय लटपटला किंवा वरती जाताना हात निसटला, तर अख्खा थर खाली कोसळण्याची भीती असते, ही खबरदारी घेऊन मगच थर रचला जातो.

- प्रगती जाधव-पाटील