शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

फेसबुकवर गोविंद पानसरे अमर रहे!

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

मृत्युनंतरही अकाऊंट सुरूच : चित्रफीत, ध्वनिफित, लेख अन् छायाचित्रांसाठी कार्यकर्ता पुढे सरसावला..

जगदीश कोष्टी -सातारा -‘गोळ्या झाडून माणूस संपविता येतो; पण विचार संपविता येत नाही,’ असं म्हटलं जातं. ‘अंनिस’चे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही चळवळ अधिक जोमाने वाढत आहे. त्याचप्रमाणे कॉ. गोविंद पानसरे यांचेही आहे. त्यांच्यामागे त्यांचे विचार तरुणांंपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असून, फेसबुकच्या माध्यमातून केले जात आहे.कॉ. गोविंद पानसरे यांना आधुनिक यंत्रणा हाताळण्याची माहिती नव्हती; मात्र बदलत्या तंत्रज्ञानाची महती त्यांना चांगली होती. त्यामुळे त्यांचे सहकारी सुशील लाड यांनी कॉ. पानसरे यांच्या नावाने तीन-चार वर्षांपूर्वी फेसबुकवर अकाउंट काढून दिले. हे अकाउंट हाताळायची माहिती नसली तरी पोस्ट कशी करायची, लाईक करणे म्हणजे काय, कॉमेंट कशी टाकायची हे त्यांना कार्यकर्त्यांनी शिकविले होते.चळवळीत राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संघटनेचे अधिवेशन, आंदोलन किंवा बैठक असल्यास त्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यासाठी पानसरे हे फेसबुकचा वापर करत होते. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प किंवा राज्य तसेच देश पातळीवरील नेत्यांच्या भाषणानंतर स्वत:चे मत नोंदविण्यासाठी पानसरे फेसबुकचा वापर करत होते. त्यांना हवे असलेले मत ते लाड यांना सांगत अन् लाड त्यांचे मत अपलोड करत होते. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर त्यांचे अकाउंट बंद न करता ते तसेच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे असंख्य कार्यकर्ते, तरुणाई चळवळीशी जोडली गेली आहे. विविध पुस्तकांमधून पानसरे यांनी व्यक्त केलेले विचार, मत-मतांतरे, त्यांच्या भाषणाच्या चित्रफित, ध्वनिफित, फोटो, दुर्मीळ लेख फेसबुक मित्रांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा लाड यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)कॉ. गोविंद पानसरे यांचे फेसबुक अकाउंट तीन ते चार वर्षांपासून मी चालवत आहे. फेसबूकवर काही पोस्ट करायचे असले की ते मला सांगत असत. हे अकाउंट यापुढेच चालूच ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या अकाउंटला पाच हजार मित्र झालेले आहेत. त्यांच्या फालोअर्सची संख्या वाढत आहेत. त्यामुळे फेसबुक अकाउंटचे आता पेजमध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे. - सुशील लाडचळवळीतील कार्यकर्ते.‘कार्ल मार्क्स’चा चाहतापानसरे यांनी फेसबुक अकाउंटमध्ये स्वत:विषयी लिहिताना म्हटले आहे की, ‘कम्युनिस्ट पक्षात मी कार्यरत असून, कार्ल मार्क्सचा मोठा चाहता आहे. महाराष्ट्रात समता प्रस्तापित करण्यासाठी मी संघर्ष करत राहीन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक भाग बनणार आहे.’