शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

फेसबुकवर गोविंद पानसरे अमर रहे!

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

मृत्युनंतरही अकाऊंट सुरूच : चित्रफीत, ध्वनिफित, लेख अन् छायाचित्रांसाठी कार्यकर्ता पुढे सरसावला..

जगदीश कोष्टी -सातारा -‘गोळ्या झाडून माणूस संपविता येतो; पण विचार संपविता येत नाही,’ असं म्हटलं जातं. ‘अंनिस’चे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही चळवळ अधिक जोमाने वाढत आहे. त्याचप्रमाणे कॉ. गोविंद पानसरे यांचेही आहे. त्यांच्यामागे त्यांचे विचार तरुणांंपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असून, फेसबुकच्या माध्यमातून केले जात आहे.कॉ. गोविंद पानसरे यांना आधुनिक यंत्रणा हाताळण्याची माहिती नव्हती; मात्र बदलत्या तंत्रज्ञानाची महती त्यांना चांगली होती. त्यामुळे त्यांचे सहकारी सुशील लाड यांनी कॉ. पानसरे यांच्या नावाने तीन-चार वर्षांपूर्वी फेसबुकवर अकाउंट काढून दिले. हे अकाउंट हाताळायची माहिती नसली तरी पोस्ट कशी करायची, लाईक करणे म्हणजे काय, कॉमेंट कशी टाकायची हे त्यांना कार्यकर्त्यांनी शिकविले होते.चळवळीत राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संघटनेचे अधिवेशन, आंदोलन किंवा बैठक असल्यास त्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यासाठी पानसरे हे फेसबुकचा वापर करत होते. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प किंवा राज्य तसेच देश पातळीवरील नेत्यांच्या भाषणानंतर स्वत:चे मत नोंदविण्यासाठी पानसरे फेसबुकचा वापर करत होते. त्यांना हवे असलेले मत ते लाड यांना सांगत अन् लाड त्यांचे मत अपलोड करत होते. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर त्यांचे अकाउंट बंद न करता ते तसेच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे असंख्य कार्यकर्ते, तरुणाई चळवळीशी जोडली गेली आहे. विविध पुस्तकांमधून पानसरे यांनी व्यक्त केलेले विचार, मत-मतांतरे, त्यांच्या भाषणाच्या चित्रफित, ध्वनिफित, फोटो, दुर्मीळ लेख फेसबुक मित्रांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा लाड यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)कॉ. गोविंद पानसरे यांचे फेसबुक अकाउंट तीन ते चार वर्षांपासून मी चालवत आहे. फेसबूकवर काही पोस्ट करायचे असले की ते मला सांगत असत. हे अकाउंट यापुढेच चालूच ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या अकाउंटला पाच हजार मित्र झालेले आहेत. त्यांच्या फालोअर्सची संख्या वाढत आहेत. त्यामुळे फेसबुक अकाउंटचे आता पेजमध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे. - सुशील लाडचळवळीतील कार्यकर्ते.‘कार्ल मार्क्स’चा चाहतापानसरे यांनी फेसबुक अकाउंटमध्ये स्वत:विषयी लिहिताना म्हटले आहे की, ‘कम्युनिस्ट पक्षात मी कार्यरत असून, कार्ल मार्क्सचा मोठा चाहता आहे. महाराष्ट्रात समता प्रस्तापित करण्यासाठी मी संघर्ष करत राहीन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक भाग बनणार आहे.’