शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सरकार जगू देईना... कारखाने मरू देईनात!

By admin | Updated: September 3, 2015 22:10 IST

शेतकरी अडचणीत : पाणीटंचाईमुळे ऊसलागण, गाळपावर शासन लावणार निर्बंध

कोरेगाव : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि भरवशाचे पीक असलेल्या उसावर गदा आणण्याचा खटाटोप शासनस्तरावरुन सुरु आहे. पाण्याचा अत्यल्प साठा हे त्यामागील कारण दाखविले जात असले तरी त्यात खरे मरण आहे ते शेतकऱ्याचेच. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कारखान्यांनी अपेक्षित दर दिलेला नाही आणि हप्त्यांचे टप्पे देखील वेळेत काढले नसल्याने शेतकरी अगोदरच देशोधडीला लागला आहे. एकूणच सरकारची नवी भूमिका म्हणजे ‘सरकार जगू देईना... कारखाने मरू देईनात’ अशीच शेतकऱ्यांसाठी झाली आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वीच सत्तेवर आलेल्या सरकारने पावसाचे कमी झालेले प्रमाण, दुष्काळसदृश परिस्थिती पाहून धरणातील पाणीसाठे पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याचे नियोजन पाहता ऊस पिकासाठी पाणी जास्त लागत असल्याचे कारण देऊन ऊस लागणीवर व गाळपावर निर्बंध लावण्याचे सूतोवाच केले आहे. सरकारचा हा निर्णय साखर कारखानदारीचे आगर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता कोरेगाव, खटाव, माण, फलटण व खंडाळा हे पाच तालुके दुष्काळी म्हणून गणले जातात. त्यामध्ये कोरेगाव आणि खंडाळ्याचा अंशत: समावेश होतो. पाचही तालुक्यांमध्ये पाण्याचे स्त्रोत कमी असले तरी गेल्या काही वर्षांपासून धोम, धोम-बलकवडी, कण्हेर आणि उरमोडी धरणाच्या पाण्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी उसासारख्या नगदी पिकाला हात घातला आहे. केवळ सातारा नव्हे तर पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने या पाच तालुक्यातील उसावर विसंबून असतात, हे नाकारू शकत नाही. उसाच्या पैशांवर पाचही तालुक्यांनी चांगला विकास साधला आहे. राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीकडे दुर्लक्ष केल्याने कारखानदारी आर्थिक अडचणीत येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर न दिल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आला आणि शेतकरी संघटनांनी कारखानदारीला टार्गेट करण्यास सुरुवात केली. सातारा जिल्ह्यात आणि या पाच तालुक्यांमध्ये शेतकरी आंदोलनांनी अधिक धग पकडली होती. शेतकरी आंदोलनानंतरही कारखान्यांनी एफ. आर. पी. प्रमाणे दर देण्यास असमर्थता दर्शविली. त्याचबरोबर हप्त्यांचे टप्पे देखील वेळेत काढले नसल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. सरकारने दुष्काळाची चाहूल ओळखून उपाययोजना करण्याकडे लक्ष केंद्रित करावयास हवे होते, मात्र त्यांनी वेळकाढूपणा करत थेट शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारीला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील विकासात्मक डोलारा कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकट्या सातारा जिल्ह्यात ९ साखर कारखाने असून, नजीकच्या पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील १० ते १२ कारखाने सातारा जिल्ह्याच्या उसावरच बऱ्यापैकी अवलंबून असतात. सरकारने उसावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिम महाराष्ट्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांसह शासनाचेही नुकसानसाखर कारखानदारी केवळ साखर निर्मिती करणारा उद्योग राहिलेला नाही. उपपदार्थ निर्मिती आणि शैक्षणिक संस्थांबाबत कारखानदारी पुढे आलेली आहे. वीज, सेंद्रिय खत, डिस्टीलरी व बगॅस निर्मिती कारखाने करत असून, त्यापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. कारखान्यांसह शेतकऱ्यांकडून उसावर अनेकविध कर आकारले जात असून, त्याचा फायदाही सरकारलाच होत आहे. त्यामुळे सरकारने केवळ दुष्काळाच्या लेबलखाली ऊस लागण आणि गाळपास प्रतिबंध केल्यास शेतकऱ्यांसह सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. साखर कारखान्यांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना देखील थोडाफार फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.