शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: December 31, 2015 00:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : साजूर येथे विविध कामांचे भूमीपूजन, उद्घाटन

\तांबवे : ‘युवकांच्या हाताला काम द्यायचे असेल तर मोठ-मोठे उद्योगधंदे तालुक्यात आले पाहिजेत. शेतीमध्ये औद्योगिकरण झाले तर सर्वांगिण विकास होईल. सध्या सरकारला प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा हवेतच राहिल्या आहेत. सध्या राज्यात पाऊस न पडल्यामुळे गंभीर दुष्काळ समस्या निर्माण झाली आहे. याला सामोरे जाण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. साजूर, ता. कऱ्हाड येथील विविध विकासकामे भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, सह्याद्री कारखाना संचालक पी. डी. पाटील, सरपंच शीतल मुळगावकर, उपसरपंच संदीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भीमराव डांगे, विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रकाश वास्के, जे. के. पाटील, सुरेखा डुबल, सूपने सरपंच प्रदीप थोरात, जखिणवाडी सरपंच नरेंद्र पाटील, इंद्रजित चव्हाण, अ‍ॅड. विश्वास निकम, अशोक पाटील आदी उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचा विकास कामातून कायापालट करणार आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील प्रशासनाची घडी बसविली आहे. यामुळे आज आपले राज्य एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. साखरेचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ मिळते की नाही याची चिंता आहे. शेतकऱ्याला आपल्या पायावर उभे करायचे असेल, तर या सरकारने कर्जमाफी करू न त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. आज लोकसहभागातून गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी झटले पाहिजे,’ असे त्यांनी यावेळी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, ‘तांबवे जिल्हा परिषद मतदार संघ कुणी पाटणला जोडला हे सर्वांनाच ज्ञात आहे. काँग्रेसची अनेक पदे भोगूनही पदाविरूद्ध कामे केली आहेत. त्यांना बाबांनी विधानसभेमध्ये जनाधार दाखविला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कऱ्हाड तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी विकासकामासाठी आणला आहे.’यावेळी शीतल मुळगावकर, विकास कांबळे, पी. डी. पाटील, प्रकाश पाटील, हिंदुराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शीतल मुळगावकर व उपसरपंच संदीप पाटील यांनी स्वागत केले.विकास कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.विजय चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)