शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

‘जयवंत शुगर’च्या वजनकाट्यावर शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

यावेळी वजनकाट्यामध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात ...

यावेळी वजनकाट्यामध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याने, जयवंत शुगर्सचा वजनकाटा हा अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या समितीकडून देण्यात आले. त्यामुळे जयवंत शुगरच्या वजनकाट्याला शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर प्राप्त झाली आहे.

विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. त्यानुसार कऱ्हाडचे नायब तहसीलदार व्ही. आर. माने, वैद्यमापनशास्त्र निरीक्षक रा. पां. आखरे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, युवाध्यक्ष विश्वास जाधव आदींनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा समितीने दिला. कारखान्याचे इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एस. सोमदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.