शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कऱ्हाडात वीजबिले फाडून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:59 IST

यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. ...

यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. समीर देसाई, उत्तमराव खबाले, राज्य संघटक दीपक पाटील, तात्या पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी दुपारी शहरातील दत्त चौकात जमा झाले. तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शासनासह वीज वितरण कंपनीच्या धोरणाचा निषेध करीत बिले फाडण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या शेतकरी व शेतमजुरांकडे घरखर्चासाठीही पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. अशा कालावधीत शासनाने त्यांना मदत करणे गरजेचे असताना याउलट त्यांच्या शेतीपंपांचे व घरातील वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून सरकार करीत आहे. त्यातच, वीजबिले चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे. भरमसाट वाढ करून शेतक-यांच्या माथी बिले मारण्यात आली आहेत. महावितरणने वसुली तत्काळ थांबवावी. ज्या शेतक-यांचे कनेक्शन तोडले आहे, ते कनेक्शन पूर्ववत जोडावे. अन्यथा, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

- चौकट

शासनच शेतक-यांना देणे लागते!

गतवर्षी नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, आजअखेर ती मदत मिळालेली नाही. उसाला एकरकमी एफआरपी मिळालेली नाही. पीकविमा मिळालेला नाही. अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा प्रकारे शासनच शेतक-यांना देणे लागत असताना कनेक्शन तोडण्याचे पाप शासनाकडून सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

फोटो : २२केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीजबिले फाडून शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध केला.