शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

आठवडी बाजाराबाबत शासनाने निर्णय घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल किंमत आली आहे. कोरोना काळात व्यापारी मालामाल झाले आहेत. बाजारतळ व मंडई बंद असल्याने व्यापारी व शेतकरी मिळेल त्या ठिकाणी मालाची विक्री करत आहेत. त्यामुळे शासनाने आठवडी बाजाराबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

गतवर्षी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वत्र लाॅकडाऊन घोषित केला होता. यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यावेळी अंशतः अत्यावश्यक व्यवहाराला थोडीफार सूट देण्यात आली होती. शेतकऱ्यांना ही शेतीमाल फिरून विक्री करण्यास परवानगी दिली होती.

त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू केले. मात्र, त्या काळातील आठवडी बाजाराची बंदी कायम ठेवली होती. आठवडी बाजार सुरू होतील, अशी आशा शेतकऱ्यांचे व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकालाही होती. मात्र त्यातच कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. हळूहळू सुरू झालेले व्यवहार पुन्हा बंद झाले. त्यामुळे आठवड्याची बाजार सुरू होण्याची आशा मावळली.

गेल्या महिन्यापासून शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू केले आहेत तसेच शाळा-महाविद्यालयही ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे तर मंदिरे ही घटस्थापनेच्या दिवशी सुरू होत आहेत. तर सिनेमागृह व नाट्य मंदिरेही पुढील महिन्यात सुरू होत असल्याने शासनाने आठवडी बाजाराविषयी सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने तसेच सध्या शेतीमध्ये सुगीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू व्यापारीवर्ग कवडीमोल भावाने विकत घेत आहेत तसेच बाजार व बाजारस्थळांवर विक्रेत्यांना बंदी असल्याने व्यापारी ही मिळेल त्या ठिकाणी शेतीमालाची विक्री करत आहे. त्यामुळे शासनाने लवकर हे आठवडी बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

(चौकट)

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले...

सुगीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला बाजारपेठेत मालाची विक्री करण्यास वेळ नाही. शेतामध्ये आलेला शेतमाल मिळेल, त्या दराने विकून पुन्हा शेतात जात आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेत आहेत व दिवसभर चढ्या भावाने विकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

फोटो... २६ मायणी

आठवडी बाजार बंद असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याकडेला चौकामध्ये मिळेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेतीमाल विकला जात आहे.

(छाया : संदीप कुंभार)