शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शौचालय नसल्यास शासकीय सुविधा बंद

By admin | Updated: October 13, 2015 00:18 IST

चाफळ ग्रामसभा : वर्षाअखेरपर्यंत शौचालय बांधण्याची सूचना; कर आकारणीस सहकार्य करण्याचे आवाहन

चाफळ : ‘स्वच्छ भारत’ मिशन अभियान अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबांनी ३१ डिंसेंबरअखेर शौचालयाची बांधकामे पूर्ण न केल्यास संबंधित कुटुंबांना शासनस्तरावरील कोणतीही शासकीय सुविधा दिली जाणार नसल्याची माहिती येथील ग्रामसभेत देण्यात आली.येथे आयोजित ग्रामसभा उपसरपंच अंकुश जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ, पोलीस पाटील दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. दीक्षित, सदस्य उमेश पवार, एल. एस. बाबर, किसनराव जाधव तसेच प्राथमिक शाळा, अंगणवाडी शाळा, वीज कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी सतीश माने यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्या साळुंखे या महिलेस वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील यांनी स्वत:च्या कारमधून रुग्णालयात नेले. त्याठिकाणी साळुंखे यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने धोका टळला. त्याबद्दल डॉ. विद्या पाटील यांच्या कौतुकाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ यांनी मांडला. त्यास सभेने मान्यता देत ठराव घेण्यात आला. रोजगार हमीच्या २०१६-१७ मधील ग्रामस्थांनी सुचविलेल्या कामांना सभेने मंजुरी दिली. यामध्ये ११ लाख ९० हजारांची कामे प्रस्तावित आहेत. सद्य:स्थितीत १८२ लोकांची जॉबकार्ड नोंदणी असून, त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे माने यांनी सांगितले. कृषी विभागाचे जलमृदुसंधारण कामाअंतर्गत विहिरीचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम राबविण्याची माहीम सुरू असून, इच्छुकांनी आपली नावे ग्रामपंचायतीस सुचविणे गरजेचे आहे. या सभेत ‘स्वच्छ भारत’ मिशन अभियान, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळअंतर्गत करावयाची कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव, बालमजूर व पुनर्वसन कायदा तसेच संग्राम कक्षामधून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चाफळमधील ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती तसेच फरशी पुलाला दोन्ही बाजूंनी तारेची संरक्षक अडथळा भिंंत बांधावी, अशी मागणी माजी सैनिक किसनराव जाधव यांनी यावेळी केली.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरी ग्रामपंचायतीने होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी डॉ. विद्या पाटील यांनी केली. ग्रामपंचायत कर आकारणी व वसुलीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन माने यांनी केले. अंकुश जमदाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)