शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

शौचालय नसल्यास शासकीय सुविधा बंद

By admin | Updated: October 13, 2015 00:18 IST

चाफळ ग्रामसभा : वर्षाअखेरपर्यंत शौचालय बांधण्याची सूचना; कर आकारणीस सहकार्य करण्याचे आवाहन

चाफळ : ‘स्वच्छ भारत’ मिशन अभियान अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबांनी ३१ डिंसेंबरअखेर शौचालयाची बांधकामे पूर्ण न केल्यास संबंधित कुटुंबांना शासनस्तरावरील कोणतीही शासकीय सुविधा दिली जाणार नसल्याची माहिती येथील ग्रामसभेत देण्यात आली.येथे आयोजित ग्रामसभा उपसरपंच अंकुश जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ, पोलीस पाटील दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. दीक्षित, सदस्य उमेश पवार, एल. एस. बाबर, किसनराव जाधव तसेच प्राथमिक शाळा, अंगणवाडी शाळा, वीज कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी सतीश माने यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्या साळुंखे या महिलेस वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील यांनी स्वत:च्या कारमधून रुग्णालयात नेले. त्याठिकाणी साळुंखे यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने धोका टळला. त्याबद्दल डॉ. विद्या पाटील यांच्या कौतुकाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ यांनी मांडला. त्यास सभेने मान्यता देत ठराव घेण्यात आला. रोजगार हमीच्या २०१६-१७ मधील ग्रामस्थांनी सुचविलेल्या कामांना सभेने मंजुरी दिली. यामध्ये ११ लाख ९० हजारांची कामे प्रस्तावित आहेत. सद्य:स्थितीत १८२ लोकांची जॉबकार्ड नोंदणी असून, त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे माने यांनी सांगितले. कृषी विभागाचे जलमृदुसंधारण कामाअंतर्गत विहिरीचे पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम राबविण्याची माहीम सुरू असून, इच्छुकांनी आपली नावे ग्रामपंचायतीस सुचविणे गरजेचे आहे. या सभेत ‘स्वच्छ भारत’ मिशन अभियान, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळअंतर्गत करावयाची कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव, बालमजूर व पुनर्वसन कायदा तसेच संग्राम कक्षामधून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चाफळमधील ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती तसेच फरशी पुलाला दोन्ही बाजूंनी तारेची संरक्षक अडथळा भिंंत बांधावी, अशी मागणी माजी सैनिक किसनराव जाधव यांनी यावेळी केली.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरी ग्रामपंचायतीने होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी डॉ. विद्या पाटील यांनी केली. ग्रामपंचायत कर आकारणी व वसुलीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन माने यांनी केले. अंकुश जमदाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)