शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

सरकारला सामान्यांची काळजी नाही

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

पृथ्वीराज चव्हाण : खोडशी येथे ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आरोप

कऱ्हाड : ‘सध्याच्या सरकारने निर्बंध उठवताच डाळींचे दर महागले. यामुळे व्यापाऱ्यांना चांगलाच याचा फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर सरकारने धान्याच्या साठ्यांवर छापे टाकले. त्यानंतर व्यापारी न्यायालयात गेले. परंतु हा खेळ करत असताना सर्वसामान्यांचे जीवन असाह्य झाल्याने त्यांची काळजी या सरकारला पडलेली नाही,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.खोडशी, ता. कऱ्हाड येथे आमदार फंडातून सुमारे २७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव पाटील होते. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, माई ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, किसनराव पाटील-घोणशीकर, सांगलीचे सचिदानंद कदम, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील, अश्विनी लवटे, खोडशी सरपंच मनीषा तांबे, उपसरपंच सचिन भोसले, नामदेव पाटील, रमेश लवटे, डॉ. सतीश थोरवडे, बाळासाहेब पवार, कृष्णत पवार आदी उपस्थित होते.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘खोडशीच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या कामामध्ये शासन निधीबरोबर माहेरवाशिणी व दानशूरांनी मदत केल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे.सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या उसाचा दर ठरवण्याची जबाबदारी सरकारने पाळलेली नाही. दुसरीकडे डाळीचे दर वाढले आहे. त्याचबरोबर या वर्षी पाणी व चाऱ्याचे संकट आपल्यासमोर आहे. याबाबत सरकार गंभीर नाही.’ असा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचंड जनसंपर्काचा विरोधकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना गट-तट न पाहता प्रत्येक गावात विकास पोहचवला.’यावेळी मनोहर शिंदे, संगीता साळुंखे, सचिदानंद कदम, हंबीरराव भोसले, संभाजीराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.राजेंद्र पाटील व सुरेश भोसले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी प्रास्ताविक केले. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)