शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सरकारला सामान्यांची काळजी नाही

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

पृथ्वीराज चव्हाण : खोडशी येथे ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आरोप

कऱ्हाड : ‘सध्याच्या सरकारने निर्बंध उठवताच डाळींचे दर महागले. यामुळे व्यापाऱ्यांना चांगलाच याचा फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर सरकारने धान्याच्या साठ्यांवर छापे टाकले. त्यानंतर व्यापारी न्यायालयात गेले. परंतु हा खेळ करत असताना सर्वसामान्यांचे जीवन असाह्य झाल्याने त्यांची काळजी या सरकारला पडलेली नाही,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.खोडशी, ता. कऱ्हाड येथे आमदार फंडातून सुमारे २७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव पाटील होते. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, माई ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, किसनराव पाटील-घोणशीकर, सांगलीचे सचिदानंद कदम, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील, अश्विनी लवटे, खोडशी सरपंच मनीषा तांबे, उपसरपंच सचिन भोसले, नामदेव पाटील, रमेश लवटे, डॉ. सतीश थोरवडे, बाळासाहेब पवार, कृष्णत पवार आदी उपस्थित होते.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘खोडशीच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या कामामध्ये शासन निधीबरोबर माहेरवाशिणी व दानशूरांनी मदत केल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे.सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या उसाचा दर ठरवण्याची जबाबदारी सरकारने पाळलेली नाही. दुसरीकडे डाळीचे दर वाढले आहे. त्याचबरोबर या वर्षी पाणी व चाऱ्याचे संकट आपल्यासमोर आहे. याबाबत सरकार गंभीर नाही.’ असा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचंड जनसंपर्काचा विरोधकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना गट-तट न पाहता प्रत्येक गावात विकास पोहचवला.’यावेळी मनोहर शिंदे, संगीता साळुंखे, सचिदानंद कदम, हंबीरराव भोसले, संभाजीराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.राजेंद्र पाटील व सुरेश भोसले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी प्रास्ताविक केले. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)