शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

सरकारला सामान्यांची काळजी नाही

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

पृथ्वीराज चव्हाण : खोडशी येथे ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आरोप

कऱ्हाड : ‘सध्याच्या सरकारने निर्बंध उठवताच डाळींचे दर महागले. यामुळे व्यापाऱ्यांना चांगलाच याचा फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर सरकारने धान्याच्या साठ्यांवर छापे टाकले. त्यानंतर व्यापारी न्यायालयात गेले. परंतु हा खेळ करत असताना सर्वसामान्यांचे जीवन असाह्य झाल्याने त्यांची काळजी या सरकारला पडलेली नाही,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.खोडशी, ता. कऱ्हाड येथे आमदार फंडातून सुमारे २७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव पाटील होते. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, माई ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, किसनराव पाटील-घोणशीकर, सांगलीचे सचिदानंद कदम, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील, अश्विनी लवटे, खोडशी सरपंच मनीषा तांबे, उपसरपंच सचिन भोसले, नामदेव पाटील, रमेश लवटे, डॉ. सतीश थोरवडे, बाळासाहेब पवार, कृष्णत पवार आदी उपस्थित होते.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘खोडशीच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या कामामध्ये शासन निधीबरोबर माहेरवाशिणी व दानशूरांनी मदत केल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे.सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या उसाचा दर ठरवण्याची जबाबदारी सरकारने पाळलेली नाही. दुसरीकडे डाळीचे दर वाढले आहे. त्याचबरोबर या वर्षी पाणी व चाऱ्याचे संकट आपल्यासमोर आहे. याबाबत सरकार गंभीर नाही.’ असा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचंड जनसंपर्काचा विरोधकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना गट-तट न पाहता प्रत्येक गावात विकास पोहचवला.’यावेळी मनोहर शिंदे, संगीता साळुंखे, सचिदानंद कदम, हंबीरराव भोसले, संभाजीराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.राजेंद्र पाटील व सुरेश भोसले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी प्रास्ताविक केले. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)