शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

शेतकऱ्यांच्या घरात सरकारचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:15 IST

सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी ...

सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी मैदानावरील सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘जिल्हा बँकेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. असे असताना बँकेच्या भरती प्रक्रियेला स्टे आणला. केवळ युवकांची बेरोजगारी वाढावी, हाच हेतू विरोधकांचा असतो. आमचे सरकार असताना साताºयाच्या कोणत्याही समस्येबाबत शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे शरद पवारांना फोन करून विचारत होते. मात्र, आता कोण वाली आहे का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवार पुढे म्हणाले, ‘जीएसटीनं शेतकºयांचं अक्षरश: कंबरटे मोडले आहे. एवढेच नव्हे शेतकºयांच्या कंपोस्ट खतावरही जीएसटी लावण्यात आला आहे. आता शेतकºयांनी नेमकं करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याच सोशल मीडियाचा दुहेरी वापर सध्या मोदींवर उलटला आहे. मोदी सरकारने जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यापलीकडे काहीच काम केले नाही. अशा प्रकारचे राष्ट्रवादी पक्ष कोणतेही राजकारण करत नाही. कोरेगाव-भीमा प्रकरणातही भाजप सरकाकडून ढिलाईपणा दाखविला गेला. मी उपमुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला होता. मात्र, या सरकारने पोलीस बंदोबस्त का दिला नाही, हे कोडे आहे. या प्रकरणातील मास्टर मार्इंड शोधला पाहिजे.’कोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्'ाची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हे न उलगडणारे कोडे आहे.’साताºयाचा मालक समजू नये : शिवेंद्रसिंहराजेसाताºयातील युवकवर्ग सुज्ञ असून, राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. त्यामुळे साताºयाचा मालक मी आहे, असे कोणी समजू नये, असा उपारोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता लगावला. सातारा जिल्ह्याचे चित्र वेगळं दाखविले जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन राष्ट्रवादीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.