शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांच्या घरात सरकारचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:15 IST

सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी ...

सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी मैदानावरील सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘जिल्हा बँकेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. असे असताना बँकेच्या भरती प्रक्रियेला स्टे आणला. केवळ युवकांची बेरोजगारी वाढावी, हाच हेतू विरोधकांचा असतो. आमचे सरकार असताना साताºयाच्या कोणत्याही समस्येबाबत शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे शरद पवारांना फोन करून विचारत होते. मात्र, आता कोण वाली आहे का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवार पुढे म्हणाले, ‘जीएसटीनं शेतकºयांचं अक्षरश: कंबरटे मोडले आहे. एवढेच नव्हे शेतकºयांच्या कंपोस्ट खतावरही जीएसटी लावण्यात आला आहे. आता शेतकºयांनी नेमकं करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याच सोशल मीडियाचा दुहेरी वापर सध्या मोदींवर उलटला आहे. मोदी सरकारने जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यापलीकडे काहीच काम केले नाही. अशा प्रकारचे राष्ट्रवादी पक्ष कोणतेही राजकारण करत नाही. कोरेगाव-भीमा प्रकरणातही भाजप सरकाकडून ढिलाईपणा दाखविला गेला. मी उपमुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला होता. मात्र, या सरकारने पोलीस बंदोबस्त का दिला नाही, हे कोडे आहे. या प्रकरणातील मास्टर मार्इंड शोधला पाहिजे.’कोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्'ाची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हे न उलगडणारे कोडे आहे.’साताºयाचा मालक समजू नये : शिवेंद्रसिंहराजेसाताºयातील युवकवर्ग सुज्ञ असून, राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. त्यामुळे साताºयाचा मालक मी आहे, असे कोणी समजू नये, असा उपारोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता लगावला. सातारा जिल्ह्याचे चित्र वेगळं दाखविले जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन राष्ट्रवादीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.