शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची शेतकऱ्यांसाठीची मदत तुटपुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST

सातारा : अतिवृष्टीमुळे शेत पिकाबरोबर अनेक ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे. हे नुकसान न भरून येण्यासारखे असल्याने शासनाने शेतकऱ्यांना ...

सातारा : अतिवृष्टीमुळे शेत पिकाबरोबर अनेक ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे. हे नुकसान न भरून येण्यासारखे असल्याने शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये इतकी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान भरून निघू शकत नाही, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्ह्यावर वारंवार अस्मानी संकट येऊन शेतकरी व सामान्य नागरिक संपूर्णत: उदध्वस्त झाला आहे; परंतु ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या प्रमाणात त्याला मदत मिळताना दिसत नाही. अगोदरच कोरोनामुळे सामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे, असे असताना अस्मानी संकटाने संपूर्ण घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तरी शासनाकडून सात ते आठ दिवस झाले असूनसुद्धा पुरेशी मदत मिळाली नाही. आपत्ती नियोजनामध्ये बसत नसल्याचे कारण सांगून भरपाई देण्यास टाळाटाळदेखील केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सामान्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्यांच्यावर चालतो, असे पशुधनही वाहून गेले आहे. अशा बाबींचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी, सखल भागांमध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड व व्यावसायिकांच्या दुकानांवर आठ ते दहा फूट पाणी असल्याने दुकानातील असलेल्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे; परंतु मागील अनुभव पाहता या अगोदरही नुकसानभरपाई मिळाली नसल्यामुळे त्याचा अहवाल घेऊन त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शासनाकडे तसेच कारखानदारांकडे व कष्टाचे ऊस बिल थकित आहे. पण नियमानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी कायद्याने देणे बंधनकारक असूनसुद्धा साखर कारखानदारांकडून ते दिले जात नाही व प्रशासनही कोणतीही कारवाई करत नाही. अशा अडचणीच्या काळामध्ये कर्जमाफी योजनेतील सरकारकडे येणेबाकी असलेले पैसे व कारखानदार यांच्याकडे असलेले घामाचे दाम व्याजासह कायद्याप्रमाणे देण्याचे आदेश व्हावेत, जेणेकरून अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

भरारी पथक नेमण्याची मागणी

नुकसानभरपाई यामध्ये अनेकवेळा अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. तरी यावर एक गोपनीय भरारीपथक नेमून खरोखर त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचली किंवा नाही, याची खातरजमा व्हावी व मदतीबाबत कोणताही शासकीय कर्मचारी वेगळ्या उद्देशाने अडवणूक करत असेल त्यावर तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.