शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

शासनाची शेतकऱ्यांसाठीची मदत तुटपुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST

सातारा : अतिवृष्टीमुळे शेत पिकाबरोबर अनेक ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे. हे नुकसान न भरून येण्यासारखे असल्याने शासनाने शेतकऱ्यांना ...

सातारा : अतिवृष्टीमुळे शेत पिकाबरोबर अनेक ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे. हे नुकसान न भरून येण्यासारखे असल्याने शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये इतकी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान भरून निघू शकत नाही, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्ह्यावर वारंवार अस्मानी संकट येऊन शेतकरी व सामान्य नागरिक संपूर्णत: उदध्वस्त झाला आहे; परंतु ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या प्रमाणात त्याला मदत मिळताना दिसत नाही. अगोदरच कोरोनामुळे सामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे, असे असताना अस्मानी संकटाने संपूर्ण घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तरी शासनाकडून सात ते आठ दिवस झाले असूनसुद्धा पुरेशी मदत मिळाली नाही. आपत्ती नियोजनामध्ये बसत नसल्याचे कारण सांगून भरपाई देण्यास टाळाटाळदेखील केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सामान्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्यांच्यावर चालतो, असे पशुधनही वाहून गेले आहे. अशा बाबींचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी, सखल भागांमध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड व व्यावसायिकांच्या दुकानांवर आठ ते दहा फूट पाणी असल्याने दुकानातील असलेल्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे; परंतु मागील अनुभव पाहता या अगोदरही नुकसानभरपाई मिळाली नसल्यामुळे त्याचा अहवाल घेऊन त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शासनाकडे तसेच कारखानदारांकडे व कष्टाचे ऊस बिल थकित आहे. पण नियमानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी कायद्याने देणे बंधनकारक असूनसुद्धा साखर कारखानदारांकडून ते दिले जात नाही व प्रशासनही कोणतीही कारवाई करत नाही. अशा अडचणीच्या काळामध्ये कर्जमाफी योजनेतील सरकारकडे येणेबाकी असलेले पैसे व कारखानदार यांच्याकडे असलेले घामाचे दाम व्याजासह कायद्याप्रमाणे देण्याचे आदेश व्हावेत, जेणेकरून अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

भरारी पथक नेमण्याची मागणी

नुकसानभरपाई यामध्ये अनेकवेळा अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. तरी यावर एक गोपनीय भरारीपथक नेमून खरोखर त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचली किंवा नाही, याची खातरजमा व्हावी व मदतीबाबत कोणताही शासकीय कर्मचारी वेगळ्या उद्देशाने अडवणूक करत असेल त्यावर तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.