शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

Lok Sabha Election 2019 महायुतीचे काम करण्याचा गोरेंचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:09 IST

दहिवडी : ‘ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही. आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे ...

दहिवडी : ‘ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही. आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल केले. एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेसने मला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अशा पक्षाबरोबर आघाडीधर्म कशासाठी पाळायचा?,’ असा प्रश्न आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.बोराटवाडी येथे आमदार गोरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला माण-खटाव विधानसभा मतदार संघातील दहा हजारहून जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसमध्ये राहायचे की जायचे, याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यकर्त्यांची मनोगते झाल्यानंतर गोरे यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली.जयकुमार गोरे म्हणाले, ‘आमदार होण्यापूर्वी माण-खटावमधील उमेदवार फलटण, माणमधून ठरवला जायचा.माण-खटाव तालुक्यातील लोकांना विश्वासात घेतले जात नव्हते. माण-खटावच्या मातीला जिल्ह्याच्या राजकारणात पत नव्हती. दुष्काळामुळे गावेच्या गावे स्थलांतरित झाली होती. उरमोडीचे पाणी माण-खटावच्या शिवारात खळखळणार म्हणून अनेकांनी केवळ मतांपुरते या मतदारसंघातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. तळागाळातील जनतेचा कधी विचार केला गेला नाही. केवळ मतांपुरते राजकारण त्यांनी केले. याला आता माझ्यासोबत माझे कार्यकर्तेही कंटाळले आहेत.माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांचा मोठा हात आहे. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण केले जाते. अशा प्रकारामुळे एखाद्याचे कुटुंब लयास जाईल. याचा कोणी विचार करत नाही. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने केले पाहिजे. समाजहित बाजूला ठेवून केवळ एकमेकांमध्ये वाद कसा होईल, हे पाहिले जाते.यावेळी उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील यांचे कार्यकर्त्यांसह मेळाव्यात आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘माझे आणि जयकुमार गोरे यांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असे असताना आज आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माण-खटावला आगामी काळात कधी अंतर देणार नाही,’ या तालुक्यातील जनतेने दुष्काळ सोसला आहे. त्यांना कोणत्या समस्येतून जावे लागते, हे मी जानतो, असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला माण-खटाव विधानसभा मतदार संघातील सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.कार्यकर्त्यांचा कौल महायुतीकडेज्या राष्ट्रवादीने जयकुमारला संपविण्यासाठी जंगजंग पछाडले, माढ्याचा उमेदवार ठरवताना विश्वासात घेतले नाही, अशा राष्ट्रवादीच्या मागे जाणे म्हणजे माण-खटावचा स्वाभिमान गहाण टाकल्यासारखे आहे. महाआघाडीला मदत करायची की महायुतीला, याचा निर्णय मी तुमच्या पारड्यात टाकतोय, असे म्हणत आ. गोरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हात वर करून कोणाचे काम करायचे? याचा कौल मागितला. यावेळी उपस्थित समुदायाने हात वर करून फक्त महायुतीचेच काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आ. जयकुमार गोरे यांनी तुमचा निर्णय तो माझा निर्णय, असे म्हणत माढा लोकसभेला महायुतीचेच काम करणार असल्याचा निर्धार केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक