शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या अर्धवट माहितीवर गोरे-शिंदेंचा थयथयाट!

By admin | Updated: October 27, 2015 00:24 IST

दिलीप येळगावकर : राज्य शासनाने अद्यादेशाद्वारे ८ आॅक्टोबरला ६२ कोटी दिल्याची माहिती

सातारा : ‘गेल्या २५ वर्षांत विजय शिवतारे यांच्याइतका आग्रही आणि दुष्काळ प्रश्नावर पोटतिडीक असलेला पालकमंत्री लाभला नसल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी त्यांच्याच प्रयत्नामुळे ८ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अद्यादेश काढून या योजनेसाठी ६२ कोटींचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली असून, आमदार शशिकांत शिंदे व आमदार जयकुमार गोरे हे अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करत आहेत,’ असा घणाघात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.जिहे-कटापूर योजनेबाबत श्रेयवाद सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेचा इतिहास मांडून सद्य:स्थितीचीही माहिती दिली. यावेळी खटाव तालुक्यातील पवारवाडी गावचे सरपंच रमेश जाधव उपस्थित होते. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भोगले; पण यापैकी एकानेही दुष्काळ प्रश्नावर तळमळ दाखविली नाही. जिहे-कटापूर योजनेवर खटाव-माण तालुक्यांतील शेतकरी डोळे लावून बसले असताना राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीच्या शासनाने केवळ निधी मंजूर केल्याचे भासवले, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही. त्यामुळे या योजनेचे काम रखडले. साहजिकच त्याची निर्मिती किंमत वाढल्याने त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला आहे,’ असा आरोपही येळगावकर यांनी केला.योजनेचा इतिहास सांगताना येळगावकर म्हणाले, ‘कर्नल आर. डी. निकम यांनी १९७८ मध्ये या जिहे-कटापूर योजनेची संकल्पना मांडली. त्यांनी शरद पवारांपासून इतर काही मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला; पण ही योजना कुणीच स्वीकारली नाही. १९९६ मध्ये युतीचे शासन आल्यानंतर निवृत्त अभियंता संघटनेने हा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. हा प्रस्ताव तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांच्यापुढे ठेवल्यानंतर या योजनेचा सर्व्हे झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. खातगुण येथे तत्कालीन मंत्री खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते योजनेच्या कामाची कुदळ मारण्यात आली. मंत्री गिरीश बापट, हिंदुराव नाईक-निंबाळकर व मी स्वत: योजनेसाठी प्रयत्न केले होते. आघाडी शासनाच्या काळात या योजनेच्या बोगद्याच्या कामाची यंत्रे बारामतीच्या जानाई-मळाई योजनेच्या कामासाठी पळविल्यानंतर मी विधानभवनापुढे उपोषण केले होते. या उपोषणानंतर सर्व साहित्य जिहे-कटापूर योजनेसाठी आणण्यात आले. पाटबंधारेच्या कामासाठी ‘हेड वाईज’ निधी मंजूर करण्यासाठी मी केलेला प्रयत्नानंतर राज्य शासनाने मंजूर केला.तत्कालीन पालकमंत्र्यांनी लहरीप्रमाणे या योजनेकडे पाहिले त्यामुळे ५ ते १० कोटींच्यावर निधी मिळाला नाही. या योजनेसाठी ६८० कोटींचा खर्च येणार असून, त्यातील ३०६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ६२ कोटींची भर पडल्याने या कामाला गती मिळेल, असा विश्वासही येळगावकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) काँगे्रस-राष्ट्रवादी नेत्यांवर साधला निशाणाआ. शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी तडजोड करून उरमोडीचे पाणी सांगलीकडे पळविण्याचा डाव आखला होता, तो आपण हाणून पाडला. आ. जयकुमार गोरे सत्ता असताना गप्प राहिले, आता अर्धवट माहितीच्या आधारावर बोलत आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी आणण्याबाबत काहीच हालचाल केली नाही. दुष्काळग्रस्तांसाठी विधानभवनापुढे आंदोलन करत असताना आ. बाळासाहेब पाटील माझ्यावर हसत होते. नाटक थांबवा, असं उपहासानं म्हणत होते; पण दुष्काळी तालुके त्यांच्या मतदारसंघाला जोडले गेल्यानंतर त्यांना दुष्काळाबाबत बोलण्याचा कंठ फुटला आहे, असे तीर सोडत येळगावकरांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. पंचपक्वान्नाचे ताट पंचपक्वान्नाचे ताट समोर ठेवून हात बांधून जेवायला लावायला सांगणाऱ्यापैकी काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेतेमंडळी होते. मात्र, पालकमंत्री विजय शिवतारे व माझ्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती देण्याची घोषणा करून राज्यपालांना पत्र लिहिले. राज्यपालांच्या सूत्रातून योजनेची सुटका करून घेतली, असेही येळगावकर म्हणाले.