शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

पाण्याच्या अर्धवट माहितीवर गोरे-शिंदेंचा थयथयाट!

By admin | Updated: October 27, 2015 00:24 IST

दिलीप येळगावकर : राज्य शासनाने अद्यादेशाद्वारे ८ आॅक्टोबरला ६२ कोटी दिल्याची माहिती

सातारा : ‘गेल्या २५ वर्षांत विजय शिवतारे यांच्याइतका आग्रही आणि दुष्काळ प्रश्नावर पोटतिडीक असलेला पालकमंत्री लाभला नसल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी त्यांच्याच प्रयत्नामुळे ८ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अद्यादेश काढून या योजनेसाठी ६२ कोटींचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली असून, आमदार शशिकांत शिंदे व आमदार जयकुमार गोरे हे अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करत आहेत,’ असा घणाघात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.जिहे-कटापूर योजनेबाबत श्रेयवाद सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेचा इतिहास मांडून सद्य:स्थितीचीही माहिती दिली. यावेळी खटाव तालुक्यातील पवारवाडी गावचे सरपंच रमेश जाधव उपस्थित होते. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भोगले; पण यापैकी एकानेही दुष्काळ प्रश्नावर तळमळ दाखविली नाही. जिहे-कटापूर योजनेवर खटाव-माण तालुक्यांतील शेतकरी डोळे लावून बसले असताना राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीच्या शासनाने केवळ निधी मंजूर केल्याचे भासवले, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही. त्यामुळे या योजनेचे काम रखडले. साहजिकच त्याची निर्मिती किंमत वाढल्याने त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला आहे,’ असा आरोपही येळगावकर यांनी केला.योजनेचा इतिहास सांगताना येळगावकर म्हणाले, ‘कर्नल आर. डी. निकम यांनी १९७८ मध्ये या जिहे-कटापूर योजनेची संकल्पना मांडली. त्यांनी शरद पवारांपासून इतर काही मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला; पण ही योजना कुणीच स्वीकारली नाही. १९९६ मध्ये युतीचे शासन आल्यानंतर निवृत्त अभियंता संघटनेने हा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. हा प्रस्ताव तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांच्यापुढे ठेवल्यानंतर या योजनेचा सर्व्हे झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. खातगुण येथे तत्कालीन मंत्री खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते योजनेच्या कामाची कुदळ मारण्यात आली. मंत्री गिरीश बापट, हिंदुराव नाईक-निंबाळकर व मी स्वत: योजनेसाठी प्रयत्न केले होते. आघाडी शासनाच्या काळात या योजनेच्या बोगद्याच्या कामाची यंत्रे बारामतीच्या जानाई-मळाई योजनेच्या कामासाठी पळविल्यानंतर मी विधानभवनापुढे उपोषण केले होते. या उपोषणानंतर सर्व साहित्य जिहे-कटापूर योजनेसाठी आणण्यात आले. पाटबंधारेच्या कामासाठी ‘हेड वाईज’ निधी मंजूर करण्यासाठी मी केलेला प्रयत्नानंतर राज्य शासनाने मंजूर केला.तत्कालीन पालकमंत्र्यांनी लहरीप्रमाणे या योजनेकडे पाहिले त्यामुळे ५ ते १० कोटींच्यावर निधी मिळाला नाही. या योजनेसाठी ६८० कोटींचा खर्च येणार असून, त्यातील ३०६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ६२ कोटींची भर पडल्याने या कामाला गती मिळेल, असा विश्वासही येळगावकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) काँगे्रस-राष्ट्रवादी नेत्यांवर साधला निशाणाआ. शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी तडजोड करून उरमोडीचे पाणी सांगलीकडे पळविण्याचा डाव आखला होता, तो आपण हाणून पाडला. आ. जयकुमार गोरे सत्ता असताना गप्प राहिले, आता अर्धवट माहितीच्या आधारावर बोलत आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी आणण्याबाबत काहीच हालचाल केली नाही. दुष्काळग्रस्तांसाठी विधानभवनापुढे आंदोलन करत असताना आ. बाळासाहेब पाटील माझ्यावर हसत होते. नाटक थांबवा, असं उपहासानं म्हणत होते; पण दुष्काळी तालुके त्यांच्या मतदारसंघाला जोडले गेल्यानंतर त्यांना दुष्काळाबाबत बोलण्याचा कंठ फुटला आहे, असे तीर सोडत येळगावकरांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. पंचपक्वान्नाचे ताट पंचपक्वान्नाचे ताट समोर ठेवून हात बांधून जेवायला लावायला सांगणाऱ्यापैकी काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेतेमंडळी होते. मात्र, पालकमंत्री विजय शिवतारे व माझ्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती देण्याची घोषणा करून राज्यपालांना पत्र लिहिले. राज्यपालांच्या सूत्रातून योजनेची सुटका करून घेतली, असेही येळगावकर म्हणाले.