शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

देवाला कोंडून म्हणे.. धोंडी धोंडी पाऊस दे!

By admin | Updated: August 24, 2015 23:15 IST

वरुणराजाला साकडे : सायगावमध्ये शिवलिंग डोक्यावर घेऊन गावातून दिल्या आरोळ्या; पाटण तालुक्यातील बहुले, गारवडेत कोंडला महादेव

सायगाव/मल्हारपेठ : पावसानं ओढ दिल्यानं हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाला आहे. लवकर पाऊस पडावा, दुष्काळ हटावा, यासाठी जावळी तालुक्यातील महिगाव येथील युवकांनी वरुणराजाला ‘मेघराजा पाऊस दे... शेरडं-करडं जगू दे.. असे भावनिक आवाहन केले तर पाटण तालुक्यातील बहुले, गारवडी परिसरातील ग्रामस्थांनी महादेवाला जलाभिषेक घालून देवाला कोंडून ठेवले. सायगाव पश्चिम भागात यंदा पिके जोमात आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. ‘पाऊस मागणे’ यासारख्या प्रथेतून बळीराजा अगतिक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दोन युवकांना कमरेला लिंबाचा पाला गुंडाळून डोक्यावर शिवलिंग देऊन दारोदार आरोळ्या देत फिरविले जाते. त्यांच्या डोक्यावरील पिंडीवर जलाभिषेक केला जातो. यामुळे पाऊस पडेल, अशी लोकांमध्ये धारणा आहे. पाटण तालुक्यात पिके फुलोऱ्यात आली आहेत, मात्र पाऊस नसल्यामुळे फलधारणा धोक्यात आली आहे. ढगाळ वातावरण असून पाऊस पडत नाही. त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन फेरी काढली. त्यानंतर महादेवाला जलाभिषेक घालून पिंडीला पाण्यात ठेवण्यात आले. अशा प्रकारे देवाला कोंडल्यामुळे पाऊस पडतो, अशी लोकांमध्ये धारणा आहे. (वार्ताहर) असा मागितला जातो पाऊस दोन युवकांच्या कमरेला लिंबाचे डहाळे गुंडाळतात डोक्यावर शिवलिंग ठेवून दारोदार फिरविले जाते आरोळ्या देऊन वरुणराजाला आवाहन केले जाते गावकरी डोक्यावरील पिंडीला जलाभिषेक करतात प्रत्येक घरातून भाजी-भाकरीचा शिधा दिला जातो एकत्र गोलाकार बसून शिधा आवडीने खातात जोवर पाऊस पडत नाही, तोवर रोज पाऊस मागतात पावसासाठी आरोळ्या मेघराजा पाऊस दे, शेरडं करडं जगू दे... धोंडी राहिला शिवेवर, पाऊस आला गावावर कोण म्हणतं येत नाय, आल्याशिवाय राहत नाय!