शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2017 23:27 IST

बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी ‘किसान क्रांती’ संघटनेच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. मोर्चाच्या पुढे वाजंत्री होते. वाजंत्रीच्या सुरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता. पाठीमागे बैलगाडी, शेळ्या, मेढ्यांचे कळप होते. एका रांगेत हा मोर्चा निघाला होता. या आगळ्या-वेगळ्या मोर्चाकडे पाहून रस्त्यारून ये-जा करणारे कुतूहलाने पाहत होते. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचाही घोषणा देण्यासाठी उत्साह वाढत होता. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. एक जूनपासून शेतकरी बेमुदत संपावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर वाजंत्रीचा सूर ऐकून कार्यालयातील कर्मचारीही हा मोर्चा पाहण्यासाठी बाहेर आले. बुधाजी मुळीक हे पोटतिडकीने मागण्या शेतकऱ्यांपुढे मांडत असताना शेळ्या, मेढ्यांही जागच्या जागी शांत उभ्या राहिल्या होत्या. शेतकऱ्यांची ही अनोखी शिस्त पाहून अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.