शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

माणची चळवळ दिशा देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST

दहिवडी : माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ राज्याला दिशा देणारी आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हा ...

दहिवडी : माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ राज्याला दिशा देणारी आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले.

दहिवडी येथील प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित माण खटाव वसुधराव समृद्ध गाव योजनेत निवड झालेल्या २९ गावे व जलदूताच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी कासार, डॉ. माधवराव पोळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, पाणी फाऊंडेशनचे ननावरे, आबा लाड, आजित पवार, बलवंत पाटील, नंदकुमार खोत, सुनील पोळ, सिद्धार्थ गुंडगे, संदीप खाडे उपस्थित होते.

गौडा म्हणाले, ‘माण तालुक्याच्या मातीत श्रमदानाची चळवळ रुजली आहे. येथील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या एकजुटीमुळे तालुक्यातील गावांनी वॉटरकप स्पर्धेत बक्षीस फटकाविले. समृद्ध गाव स्पर्धेतही ही गावे चमकतील.’

आमदार गोरे म्हणाले, ‘माणमध्ये बाहेरून पाणी आले. मोठ्या प्रमाणात पाणी आडवले पण आपण पाटाने पाणी देतो हे खूप वेदनादायी आहे. यापुढे पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तरच याचा उपयोग आहे. सर्व राजकारण्यांना एकत्र आणण्याचे काम या चळवळीने केले. यापुढे ही या चळवळीला राजकीय वास येऊ देऊ नका.’

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘माण तालुक्यातील अनेक गावांनी या योजनेत सहभाग घेतला. आजही समृद्ध गाव योजनेत सर्वांत जास्त गावे तालुक्यातील आहेत. वॉटरकप स्पर्धेत समृद्ध गाव योजनेचा पहिला टप्पा २९ गावांनी पूर्ण केला. यापुढील प्रवास खडतर आहे. त्यामुळे सर्वांनी गाव पातळीवर नियोजन करावे, प्रत्येक कुटुंब समृद्ध व्हावे यासाठी प्रयत्न व्हावा.’

फोटो

दहिवडी येथे समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिला टप्पा पूर्ण केलेल्या गावांना विनय गौडा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)