शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

उसाला ३,५०० पहिला हप्ता द्या:रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:48 IST

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, ...

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे कर्ज बुडवून गेले तरी बँका बुडाल्या नाहीत. मग लाखात कर्ज असून शेतकरी काळजीने आत्महत्या करत आहेत. अशावेळी रडत बसू नका तर लढण्यासाठी तयार राहा. हमीभाव नसल्याने आता कर्ज बुडवा,’ असा सल्ला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी उसाला ३,५०० रुपये पहिला हप्ता द्यावा, असे स्पष्ट केले.क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, शंकरराव गायकवाड, महिला आघाडी राज्यध्यक्षा वंदना माळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष विकास जाधव, टी. के. आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.रघुनाथदादा म्हणाले, ‘रिकव्हरीचा पाया बदलून तुमचा खिसा कापला जात आहे. गुजरातमध्ये टनाला ४,७४१ रुपये भाव आहे. तुमच्या उसाला १,५०० रुपये कमी देत आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी आहे. ३,५०० रुपये पहिला हप्ता मिळण्याची गरज आहे. उपपदार्थातील ५० टक्के नफा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे. ऊस बिलातून अनेक कारणांनी पैसे कापले; पण भामट्या कारखानदार व सरकारने या ठेवी बुडविण्याचे पाप केले आणि ठेवींचे रुपांतर शेअर्समध्ये केले. डिव्हिडंट नसल्याने शेतकºयांचे नुकसान आणि कारखान्याचे शेअर भांडवल वाढले आहे.आपेट म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांची २३ रोजी ऊस परिषद होत असून, त्याला मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ऊस परिषद कशासाठी? एफआरपीचे २५५ कोटी रुपये शेतकºयांना शासनाकडून येणे आहे. ती अगोदर मिळणे आवश्यक आहे.’एफआरपीचे तुकडे करणाºयांचा निषेध...‘मागीलवेळी शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी एफआरपीच्या वर २०० रुपये घेऊन आंदोलन मागे घेतले. केवळ रघुनाथदादा पाटील यांनी शेवटपर्यंत ३,५०० रुपयांच्या एफआरपी वर ठाम राहिले. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करणाºयांचा आम्ही निषेध करतो. शेतकºयांची वीज कपात होत असताना सत्ताधारी आणि विरोधक हे गप्प बसत आहेत, याचा आम्ही निषेध करतो, असे शिवाजीराव नांदखिले यांनी स्पष्ट केले.