शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’साठी युवकांना गती द्या

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

एन.जे. पवार : सकारात्मक उपक्रम राबविण्याचे केले आवाहन

सातारा : ‘आजच्या युवकाला दिशा दिली तर क्रांतिकारी म्हणून पुढे येतील. त्यांना योग्य गती द्या, म्हणजे ‘जलयुक्त शिवार’ अभियान निश्चितपणे यशस्वी होईल,’ अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत दुष्काळ निवारणात विद्यार्थ्यांचा सहभाग यावर येथील नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्र. कुलगुरू डॉ. अशोकराव भोईटे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे. पी. शिंदे, अशासकीय सदस्य विजयराव पंडित, सुजित आंबेकर आदी उपस्थित होते.भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठामध्ये विहीर खोदून पाण्याच्याबाबतीत आम्ही स्वयंपूर्ण झालो. तर मग दुष्काळी गावे योग्य नियोजन केल्यास स्वयंपूर्ण का होणार नाहीत.’ जी. श्रीकांत म्हणाले, ‘पावसाचे पडणारे पाणी योग्य उपाययोजना करून ते जमिनीमध्ये जिरविले पाहिजे. काही गावे दत्तक घ्यायची. त्या गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवून द्यायचे. टँकरमुक्त धोरण याला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे. विद्यार्थ्यांची ताकद ही खूप मोठी आहे. त्यासाठी या अभियानामध्ये त्यांचा सहभाग हे या अभियानाचे फलित ठरेल.’ अविनाश पोळ म्हणाले,‘भविष्यामधील युद्ध हे पाण्यावरून होईल. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यात पाण्यावरून संघर्ष असेल. ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही एक तुम्हाला संधी आहे. या संधीचा पूर्णपणे वापर करा.’ यावेळी डॉ. भोईटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पराग सोमण यांनी स्वागत केले. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विजयराव पंडित यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)