शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

‘जलयुक्त शिवार’साठी युवकांना गती द्या

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

एन.जे. पवार : सकारात्मक उपक्रम राबविण्याचे केले आवाहन

सातारा : ‘आजच्या युवकाला दिशा दिली तर क्रांतिकारी म्हणून पुढे येतील. त्यांना योग्य गती द्या, म्हणजे ‘जलयुक्त शिवार’ अभियान निश्चितपणे यशस्वी होईल,’ अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत दुष्काळ निवारणात विद्यार्थ्यांचा सहभाग यावर येथील नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्र. कुलगुरू डॉ. अशोकराव भोईटे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे. पी. शिंदे, अशासकीय सदस्य विजयराव पंडित, सुजित आंबेकर आदी उपस्थित होते.भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठामध्ये विहीर खोदून पाण्याच्याबाबतीत आम्ही स्वयंपूर्ण झालो. तर मग दुष्काळी गावे योग्य नियोजन केल्यास स्वयंपूर्ण का होणार नाहीत.’ जी. श्रीकांत म्हणाले, ‘पावसाचे पडणारे पाणी योग्य उपाययोजना करून ते जमिनीमध्ये जिरविले पाहिजे. काही गावे दत्तक घ्यायची. त्या गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवून द्यायचे. टँकरमुक्त धोरण याला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे. विद्यार्थ्यांची ताकद ही खूप मोठी आहे. त्यासाठी या अभियानामध्ये त्यांचा सहभाग हे या अभियानाचे फलित ठरेल.’ अविनाश पोळ म्हणाले,‘भविष्यामधील युद्ध हे पाण्यावरून होईल. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यात पाण्यावरून संघर्ष असेल. ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही एक तुम्हाला संधी आहे. या संधीचा पूर्णपणे वापर करा.’ यावेळी डॉ. भोईटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पराग सोमण यांनी स्वागत केले. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विजयराव पंडित यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)