शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पाणी द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:48 IST

कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर ...

कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, नाहीतर आगामी काळातील निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार, असा एल्गार कुकुडवाड येथील पाणी परिषदेत टेंभू जलसिंचन योजनेतून वंचित राहिलेल्या गावांतील ग्रामस्थांनी केला. तसेच शासनाला आमच्या हक्काचे पाणी द्यायला लोकचळवळीच्या माध्यमातून भाग पाडू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.माण-खटाव तालुक्यांतील एकूण ३२ गावांतील ग्रामस्थ एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून पाण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे. त्यातून या परिसरातील शेतकºयांच्या दुष्काळी परिस्थितीत ढासळलेल्या वार्षिक आर्थिक उत्पन्नाला व उत्पादनाला कुठं तरी सावरता येईल, यासाठी सर्वसामान्यांना हा लढा उभारण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना सावरण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी परिसरातील शेतकºयांच्या शिवारात पोहोचणे गरजेचे आहे. तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाणी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, कलेढोण, विखळे, पाचवडसह परिसरातील लोकांनी एकत्र येऊन पाणी परिषदेत केला आहे. आमच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पाण्यासाठीचा लढा व लोकचळवळ अशीच चालू ठेवण्याचा निर्धारही पाणी परिषदेत केला.कुकुडवाड परिसरात पाणी उशाला; पण कोरड घशाला, अशी स्थिती झाली आहे. टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी सांगली भागातील शिवारात पोहोचले आहे. उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड गावच्या खालच्या बाजूने गेले असून, त्याचा कोणताच उपयोग येथील शेतकºयांना होत नाही. तेच आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे. ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात केली आहे. तहानलेल्या दुष्काळी भागातील लोकांची कायमस्वरुपी तहान कधी भागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चळवळीच्या माध्यमातून परिसराला कायमचे टँकरमुक्त करायचे आहे. या परिषदेमध्ये आ. जयकुमार गोरे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई, पंचायत समितीचे सदस्य तानाजी काटकर, तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, अनेक मान्यवर उपस्थित होते.