शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पाणी द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:48 IST

कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर ...

कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, नाहीतर आगामी काळातील निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार, असा एल्गार कुकुडवाड येथील पाणी परिषदेत टेंभू जलसिंचन योजनेतून वंचित राहिलेल्या गावांतील ग्रामस्थांनी केला. तसेच शासनाला आमच्या हक्काचे पाणी द्यायला लोकचळवळीच्या माध्यमातून भाग पाडू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.माण-खटाव तालुक्यांतील एकूण ३२ गावांतील ग्रामस्थ एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून पाण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे. त्यातून या परिसरातील शेतकºयांच्या दुष्काळी परिस्थितीत ढासळलेल्या वार्षिक आर्थिक उत्पन्नाला व उत्पादनाला कुठं तरी सावरता येईल, यासाठी सर्वसामान्यांना हा लढा उभारण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना सावरण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी परिसरातील शेतकºयांच्या शिवारात पोहोचणे गरजेचे आहे. तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाणी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, कलेढोण, विखळे, पाचवडसह परिसरातील लोकांनी एकत्र येऊन पाणी परिषदेत केला आहे. आमच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पाण्यासाठीचा लढा व लोकचळवळ अशीच चालू ठेवण्याचा निर्धारही पाणी परिषदेत केला.कुकुडवाड परिसरात पाणी उशाला; पण कोरड घशाला, अशी स्थिती झाली आहे. टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी सांगली भागातील शिवारात पोहोचले आहे. उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड गावच्या खालच्या बाजूने गेले असून, त्याचा कोणताच उपयोग येथील शेतकºयांना होत नाही. तेच आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे. ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात केली आहे. तहानलेल्या दुष्काळी भागातील लोकांची कायमस्वरुपी तहान कधी भागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चळवळीच्या माध्यमातून परिसराला कायमचे टँकरमुक्त करायचे आहे. या परिषदेमध्ये आ. जयकुमार गोरे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई, पंचायत समितीचे सदस्य तानाजी काटकर, तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, अनेक मान्यवर उपस्थित होते.