शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का...!

By admin | Updated: February 19, 2015 23:44 IST

भीती पळाली : समाजकंटकांच्या कृतीला विद्यार्थ्यांचे विवेकी उत्तर

जगन्नाथ कुंभार - मसूर कवठे, ता. कऱ्हाड येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात महाशिवरात्रीच्या सुटीत समाजकंटकांनी शाळेतील संगणक, फर्निचर, कागदपत्रे शाळेच्या पटांगणावर व समोरील ओढ्यात टाकली होती. याचा कोणत्याही प्रकारच्या भीतीचा लवलेश न बाळगता बुधवारी मुलांनी शंभर टक्के हजेरी लावत शाळा नव्या उत्साहाने भरली, याठिकाणी मंगळवारी काही असा प्रकार घडला होता, असे कोणाला वाटलेच नाही. येथील प्रशासनाने विद्यालयाच्या काळ्या रंगाने विद्रूप केलेल्या भिंती पेंटर आणून पूर्वीसारख्या केलेल्या होत्या. त्यामुळे या भिंतीवर कुठे काय लिहिले होते, हे दुर्बिणीतूनही दिसत नव्हते. या सर्व घडल्या प्रकाराने कर्मचारी वर्ग हिरमुसला होता; परंतु ही मुले जणू आपल्या गुरूजनांना सांगत होती. ‘सर तुम्ही भिऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ या मुलांचे हसरे चेहरे पाहून कर्मचारी वर्गातही काहीही घडलेच नाही, असे वातावरण होते. सोमवारी रात्री याठिकाणी समाजकंटकांनी शाळेची केलेली नासधूस म्हणजे या सरस्वतीच्या मंदिराची केलेली अवहेलना होती. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली जो-तो या विद्यालयाकडे पळत सुटला. पाहतो तर या विद्येच्या प्रांगणात व समोरील ओढ्यात जणू काही पांढरे ढगच उतरलेत की काय, अशा पद्धतीने कागद विस्कटले होते. जमलेला जमाव हतबल होऊन या घटनेकडे पाहत होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने सकारात्मक दिशा दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस गावातील व्यक्तींच्याकडे कसून चौकशी करत आहेत. आमच्या शाळेची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांना लवकर पकडून त्यांना शिक्षा करावी. आम्हाला शाळेत येताना भीती वाटत होती; परंतु येथील शिक्षक वर्ग चांगला असून, आमच्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करत असल्याने आम्हाला आमची शाळा म्हणजे घरच वाटते,’ असे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विद्यालयास धैर्यशील कदम, हिंदुराव चव्हाण, डॉ. शंकरराव पवार, यशवंत शिक्षण संस्था खराडेचे अध्यक्ष जयसिंगराव जाधव, टी. एस. खुडे, कालगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार आदींनी भेट दिली. मसूरच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार एफ. एच. शेख, सुधाकर भोसले, व्ही. आर. शिंगटे, एस. व्ही. शेलार, एस. जे. घाडगे, एस. पी. साळुंखे, ए. जे. भादुले तपास करत आहेत. शाळा माय-माऊली माझी! शाळा ही देत असते, ज्ञानामृत पाजून ती प्रत्येकाला घडवत असते. जो तिच्या सान्निध्यात आला, त्याच्या आयुष्याचे सोनेच होते. शाळेअभावी आयुष्याची राखरांगोळी झालेले अनेकजण आपण पाहतो. त्यामुळे शाळेला माऊली मानून तिच्या छायेखाली आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यानं करायला हवा. अनेक प्रसंग येतात आणि हवेच्या झुळकीप्रमाणे निघूनही जातात. शाळा सोडायची नाही, मग वाटेल ते होवो, असा निश्चय विद्यार्थ्यांनी केला.