शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का...!

By admin | Updated: February 19, 2015 23:44 IST

भीती पळाली : समाजकंटकांच्या कृतीला विद्यार्थ्यांचे विवेकी उत्तर

जगन्नाथ कुंभार - मसूर कवठे, ता. कऱ्हाड येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात महाशिवरात्रीच्या सुटीत समाजकंटकांनी शाळेतील संगणक, फर्निचर, कागदपत्रे शाळेच्या पटांगणावर व समोरील ओढ्यात टाकली होती. याचा कोणत्याही प्रकारच्या भीतीचा लवलेश न बाळगता बुधवारी मुलांनी शंभर टक्के हजेरी लावत शाळा नव्या उत्साहाने भरली, याठिकाणी मंगळवारी काही असा प्रकार घडला होता, असे कोणाला वाटलेच नाही. येथील प्रशासनाने विद्यालयाच्या काळ्या रंगाने विद्रूप केलेल्या भिंती पेंटर आणून पूर्वीसारख्या केलेल्या होत्या. त्यामुळे या भिंतीवर कुठे काय लिहिले होते, हे दुर्बिणीतूनही दिसत नव्हते. या सर्व घडल्या प्रकाराने कर्मचारी वर्ग हिरमुसला होता; परंतु ही मुले जणू आपल्या गुरूजनांना सांगत होती. ‘सर तुम्ही भिऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ या मुलांचे हसरे चेहरे पाहून कर्मचारी वर्गातही काहीही घडलेच नाही, असे वातावरण होते. सोमवारी रात्री याठिकाणी समाजकंटकांनी शाळेची केलेली नासधूस म्हणजे या सरस्वतीच्या मंदिराची केलेली अवहेलना होती. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली जो-तो या विद्यालयाकडे पळत सुटला. पाहतो तर या विद्येच्या प्रांगणात व समोरील ओढ्यात जणू काही पांढरे ढगच उतरलेत की काय, अशा पद्धतीने कागद विस्कटले होते. जमलेला जमाव हतबल होऊन या घटनेकडे पाहत होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने सकारात्मक दिशा दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस गावातील व्यक्तींच्याकडे कसून चौकशी करत आहेत. आमच्या शाळेची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांना लवकर पकडून त्यांना शिक्षा करावी. आम्हाला शाळेत येताना भीती वाटत होती; परंतु येथील शिक्षक वर्ग चांगला असून, आमच्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करत असल्याने आम्हाला आमची शाळा म्हणजे घरच वाटते,’ असे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विद्यालयास धैर्यशील कदम, हिंदुराव चव्हाण, डॉ. शंकरराव पवार, यशवंत शिक्षण संस्था खराडेचे अध्यक्ष जयसिंगराव जाधव, टी. एस. खुडे, कालगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार आदींनी भेट दिली. मसूरच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार एफ. एच. शेख, सुधाकर भोसले, व्ही. आर. शिंगटे, एस. व्ही. शेलार, एस. जे. घाडगे, एस. पी. साळुंखे, ए. जे. भादुले तपास करत आहेत. शाळा माय-माऊली माझी! शाळा ही देत असते, ज्ञानामृत पाजून ती प्रत्येकाला घडवत असते. जो तिच्या सान्निध्यात आला, त्याच्या आयुष्याचे सोनेच होते. शाळेअभावी आयुष्याची राखरांगोळी झालेले अनेकजण आपण पाहतो. त्यामुळे शाळेला माऊली मानून तिच्या छायेखाली आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यानं करायला हवा. अनेक प्रसंग येतात आणि हवेच्या झुळकीप्रमाणे निघूनही जातात. शाळा सोडायची नाही, मग वाटेल ते होवो, असा निश्चय विद्यार्थ्यांनी केला.