शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कऱ्हाड, ढेबेवाडी ते संगमनगर मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST

यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्र लिहिले असून, त्यात म्हटले आहे की, सध्या कोकणच्या दिशेला जाण्यासाठी कऱ्हाड किंवा उंब्रज ...

यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्र लिहिले असून, त्यात म्हटले आहे की, सध्या कोकणच्या दिशेला जाण्यासाठी कऱ्हाड किंवा उंब्रज ते पाटण हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर काही अडथळा निर्माण झाल्यावर अथवा अतिवृष्टीमध्ये या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला समांतर पर्यायी मार्ग नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्यांची मोठी अडचण होते. कऱ्हाड-ढेबेवाडी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ढेबेवाडीपर्यंत पूर्ण झाले आहे; मात्र या मार्गाची नोंद प्रमुख जिल्हा मार्ग ५५ अशी आहे. या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा देऊन सुधारणा कराव्यात. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या वाखाण वस्तीपासून सुरू झालेला कऱ्हाड ते ढेबेवाडी हा मार्ग ढेबेवाडीपासून पुढे सणबूर, महिंद, सळवे, पाळशी, लेंढोरी, कुसरुंड, नाटोशी, मोरगिरी ते संगमनगर धक्का असा राज्यमार्ग प्रस्तावित करावा. हा मार्ग झाल्याने कऱ्हाडपासून ढेबेवाडीपर्यंतचा सर्व भाग कोयना विभागाला जोडला जाईल, तसेच पर्यटनाची वाढ मोठ्या प्रमाणात होईल. ढेबेवाडी विभागाला कोकणात जाण्यासाठी जवळचा व जलद मार्ग निर्माण होईल. अतिवृष्टीमध्ये कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग काही वेळा बंद होतो, त्या काळात या मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग करता येईल.

- चौकट

प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

दरम्यान काढणे, ताईगडेवाडी, मानेगाव, करपेवाडी, कुंभारगाव, पाचुपतेवाडी, कुठरे, मोरेवाडी, सणबूर, सळवे, महिंद, ढेबेवाडी, बनपुरी जानुगडेवाडी, मान्याचीवाडी, मालदन, गुढे, भोसगाव, रुवले, कारळे, तामिणे, पाळशी, अंबवडे, पाणेरी, रुवले, उधवणे, मराठवाडी आदी गावातील ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे तशी मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार व अन्य अधिकाऱ्यांची सातारा येथे बैठक घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी केल्या आहेत.