शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सुधारित पाणी योजना पालिकेकडे द्या

By admin | Updated: December 1, 2015 00:14 IST

प्राधिकरणावर संताप : पुरेसे पाणी मिळत नसल्याची नागरिकांची ओरड; हुतात्मा महाडिक यांच्या स्मारकाचा विषयही एकमताने मंजूर

सातारा : ‘शहरातील सुधारित पाणी योजनेचे काम बारगळलेल्या स्थितीत आहे. २४ तास पाण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत,’ अशा भाषेत सातारा पालिकेच्या विशेष सभेत बहुतांश नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची विशेष सभा सोमवारी छ. शिवाजी सभागृहात झाली. पाण्याबाबत नियोजन नसल्याने लोकांना टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे बहुतांश नगरसेवकांनी यावेळी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, ‘शहरातील नागरिक वारंवार पाणीटंचाईमुळे पालिकेत येतात. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता येत नाही, हे असंच सुरू राहिलं तर मोठा संघर्ष होऊ शकतो.’अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी सुधारित पाणी योजनेच्या कामाबाबत तीव्र स्वरूपात चिंता व्यक्त केली. मुदत संपूनही काम पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर कारवाई करण्याची तयारी सुरू करा, ही योजना पालिकेने ताब्यात घेतली, तर वेगाने हे काम पूर्ण होईल, असे सांगितले. नगरसेवक तुषार पाटील यांनी शहरातील ९० टक्के नळांना तोट्या नसल्याचा आरोप केला. पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे असून, शहरातील बोअरवेल लोकसहभागातून दुरुस्त केल्यास पाणीटंचाईची चिंता मिटू शकते, असे सांगितले. नगरसेवक प्रवीण पाटील, कल्याण राक्षे, निशांत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेऊन आपली मते नोंदवली. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक-घोरपडे यांच्या स्मारकाचा विषय सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. या स्मारकामुळे कर्नल संतोष यांची स्मृती कायम राहणार आहे. जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे स्मारकाचे संकल्पक अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी सांगितले. ई निविदा मागविताना बयाणा रक्कम पालिकेकडे जमा व्हावी, शासनाच्या विविध योजनांमधील कामांची निवड करून मंजुरी देणे, शनिवार पेठेतील वाहनतळ आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)जिंदा रहने के मौसम बहोत हैं मगर...!हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाला मंजुरी देताना नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांच्यासह सर्वच नगरसेवक भावूक झाले होते. अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी तर हुतात्मा गीताच्या ओळी म्हणून कर्नल संतोष यांना आदरांजली वाहिली. ‘जिंदा रहने के मौसम बहोत हैं मगर जान देने की ऋतू रोज आती नहीं...!’ अशा शब्दांनी अ‍ॅड. बाबर यांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले. या स्मारक उभारताना त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने ठेवण्याची अपेक्षा अ‍ॅड. बाबर, रवींद्र झुटिंग यांनी केली. या विषय मांडल्याबद्दल सर्वांनी अ‍ॅड. बनकर, अध्यक्ष व उपाध्यक्षांचे कौतुकही केले.