शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३१०० रूपये भाव द्या; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

दहा दिवसांचा अल्टिमेटम : ‘बळिराजा’ शेतकरी संघटनेचा कऱ्हाडात मोर्चा

कऱ्हाड : ‘उसाला ३१०० रुपये प्रतिटन भाव द्या; अन्यथा येत्या दहा दिवसानंतर संपूर्ण राज्यभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून असहकार आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी रस्त्यावर उतरू, त्याची सुरुवात आजच्या मोर्चाने करण्यात आली आहे,’ असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला.संघटनेच्या वतीने आज येथील टाऊन हॉलपासून बसस्थानक, दत्त चौकमार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, राज्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, नितीन पाटील, पाशा पटेल, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वडले, संजय पाटील, चंद्रकांत यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड करण्यात आली. ‘राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत केंद्रातील व राज्यातील सत्तेत सहभागी असल्याने आता ऊसदराबाबत बोलायला तयार नाहीत,’ असे सांगतानाच ‘बळीराजा’च्या नेत्यांनी त्यांची खिल्लीही उडविली. ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांच्या संपत्तीचा विषयही काही नेत्यांनी या वेळी उपस्थित केला. ‘बळीराजा’ ही अराजकीय संघटना असून, उसाला योग्य दर मिळेपर्यंत संघटना आंदोलन थांबविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : पंजाबराव पाटीलविदर्भ आणि मराठवाड्यातून आजकाल केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याच बातम्या ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता लढण्यास सज्ज व्हावे. संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आवाहन अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे निर्देश करून ‘हेच का अच्छे दिन,’ असा सवालही त्यांनी केला.