शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

३१०० रूपये भाव द्या; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

दहा दिवसांचा अल्टिमेटम : ‘बळिराजा’ शेतकरी संघटनेचा कऱ्हाडात मोर्चा

कऱ्हाड : ‘उसाला ३१०० रुपये प्रतिटन भाव द्या; अन्यथा येत्या दहा दिवसानंतर संपूर्ण राज्यभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून असहकार आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी रस्त्यावर उतरू, त्याची सुरुवात आजच्या मोर्चाने करण्यात आली आहे,’ असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला.संघटनेच्या वतीने आज येथील टाऊन हॉलपासून बसस्थानक, दत्त चौकमार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, राज्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, नितीन पाटील, पाशा पटेल, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वडले, संजय पाटील, चंद्रकांत यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड करण्यात आली. ‘राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत केंद्रातील व राज्यातील सत्तेत सहभागी असल्याने आता ऊसदराबाबत बोलायला तयार नाहीत,’ असे सांगतानाच ‘बळीराजा’च्या नेत्यांनी त्यांची खिल्लीही उडविली. ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांच्या संपत्तीचा विषयही काही नेत्यांनी या वेळी उपस्थित केला. ‘बळीराजा’ ही अराजकीय संघटना असून, उसाला योग्य दर मिळेपर्यंत संघटना आंदोलन थांबविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : पंजाबराव पाटीलविदर्भ आणि मराठवाड्यातून आजकाल केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याच बातम्या ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता लढण्यास सज्ज व्हावे. संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आवाहन अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे निर्देश करून ‘हेच का अच्छे दिन,’ असा सवालही त्यांनी केला.