शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

साहित्यातून बळीराजाच्या व्यथा मांडा !

By admin | Updated: December 5, 2015 00:25 IST

कृषिजागर साहित्य संमेलन : शहरातील नागरिकांनी शेतकऱ्यांना समजून घ्यावे; रा. रं. बोराडे यांचे आवाहन

सातारा (प्रा. एम.एम.कलबुर्गी व्यासपीठ) : ‘भारताला कृषिप्रधान देश म्हटले गेले असले तरी आता शेती ही फायद्याची राहिलेली नाही. शेती आपल्याला जगवू शकते, हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. शेती करण्यात अर्थ नाही, ही शेतकऱ्याची मानसिकता झाली असून, ती भयावह आहे. व्यवसायभिमुख, शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांची मानसिकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. साहित्याबरोबरच प्रत्येकात कृषिजागर निर्माण होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘कृषिजागर’साठी आयोजित केल्या दुसऱ्या सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, साहित्य परिषदेचे रवींद्र बेडकिहाळ, किशोर बेडकिहाळ, संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य बोराडे म्हणाले, ‘आज सर्वांपुढे शेतीबाबतचा आव्हानात्मक प्रश्न आणि त्याला वेगळ्या पद्धतीने भिडावे लागणार आहे. धरण कशासाठी बांधली गेली याचा विचार झाला पाहिजे. आज पाण्यासाठी छुपे युद्ध सुरू आहे. एकवेळ पाण्यासाठी प्रत्यक्षात मारामारी होण्याची वेळ येणार आहे. परंतु हे पाणी शेतकऱ्यांचे आहे. धरणे नसताना पावसाचे पाणी झिरपून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येत होते; परंतु पाणी अडवून झिरपणे बंद झाले. केवळ शेतीमध्ये काही नाही हे भीषण आणि दाहक सत्य स्वीकारले पाहिजे. शेतकऱ्याच्या नवीन पिढीला बाहेर काढले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एका मुलाला नोकरीची हमी सरकारने घ्यायला हवी.’संमेलनाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, शेतकऱ्यांची व्यथा साहित्यिकाच्या व्यासपीठावर येण्याची वेळ आली आहे. भविष्य नसलेला, सर्वंच बाबतीत परावलंबी असलेला व्यवसाय म्हणजे शेती. त्यांच्यात वेदना आहे, दु:ख आहे आणि त्यातूनच त्यांच्याकडून निर्मिती होते. अशा प्रकारच्या साहित्यासाठी शेतकरी साहित्य परिषदेची निर्मिती करू, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रमोद आलटकर, डॉ. उमेश करंबळेकर, डॉ. राजेंद्र माने, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे हरीष पाटणे, संमेलनाचे कार्याध्यक्ष संतोष यादव, राजू गाडसे, शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी, संमेलन समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध जिल्ह्यातील साहित्यिक, रसिक आणि सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)श्रीपाल सबनीस यांचा सत्कारडॉ. श्रीपाल सबनीस, रवींद्र बेडकिहाळ, स्वागताध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या प्रारंभी हुतात्मा कर्नल संतोष महाडिकआणि वर्षभरात काळाच्या पडद्याआड गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सातारकरांच्या वतीने आणि साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीने रामराजे आणि मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.