शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST

कराड : पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका ...

कराड : पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी जोरदार मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात सोमवारी खासदार् निवास पाटील यांनी रेल्वेमार्गाच्या कामात असलेल्या अनियमिततेबाबत संसदेत आवाज उठवला. यावेळी जमीन अधिग्रहणाच्या प्रलंबित प्रश्नांसह प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

खासदार पाटील म्हणाले, पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यापैकी सुमारे १०० किमी अंतराचा रेल्वेमार्ग माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातून जातो. हा प्रकल्प माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेच, मात्र या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा संपूर्ण मोबदला शेतकरी बांधवांना दिला जावा, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या निधीचा बजेटमध्ये समावेश होणे जरुरी आहे. या विस्तारीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाच्या कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर विसंगती आहे. ब्रिटिश काळात ही मीटरगेज लाईन होती, त्यास १९६७ मध्ये ब्रॉडगेज बनविण्यात आली. त्यावेळेला सर्व ठिकाणची वळणे काढून मार्ग सरळ करून घेतला होता; मात्र त्यानुसार जमिनींचे रेकॉर्ड अद्ययावत केले गेले नाही. त्यावेळी जमीन अधिग्रहण केली गेली की नाही, याचा ठोस आणि परिपूर्ण तपशील रेल्वे प्रशासनाकडे नाही. विस्तारिकरण प्रकल्पाच्या कामासाठी ज्या खासगी कंपनीने सर्व्हे केला, त्यांच्या रेकॉर्डमध्ये आणि भूमी अभिलेखच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

याविषयी संपूर्ण १०० किमी रेल्वेमार्गाचा सर्व्हे महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाने एकत्रितपणे करणे गरजेचे आहे. म्हणजे यातील असणारी तफावत दूर होईल. तसेच या सर्व्हेनंतर किती जमीन संपादित करावयाची, हे देखील निश्चित होईल. तसेच त्यासाठी देण्यात येणा-या निधीचा समावेश होणे जरूरी आहे.

या रेल्वेमार्गामुळे दोन्ही बाजूला असणा-या जमिनी, गावे, शहरे विभागली गेली आहेत. त्यामुळे येथे प्रत्येक दिवस रेल्वेमार्ग ओलांडल्याशिवाय जनजीवन चालू शकत नाही. परंतु पावसाळ्यात अनेक दिवस अंडरपास ब्रीज पाण्याखाली जातात. परिणामी ते बंद राहिल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे सर्व अंडरपास ब्रीज बारा महिने खुले ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच बोरगाव-टकले आणि लोणंद शहरातील अंडरपास ब्रीजसाठी रेल्वेने संपूर्ण खर्च उचलावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याशिवाय रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणीदेखील त्यांनी संसदेत केली.