शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST

कराड : पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका ...

कराड : पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी जोरदार मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात सोमवारी खासदार् निवास पाटील यांनी रेल्वेमार्गाच्या कामात असलेल्या अनियमिततेबाबत संसदेत आवाज उठवला. यावेळी जमीन अधिग्रहणाच्या प्रलंबित प्रश्नांसह प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

खासदार पाटील म्हणाले, पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यापैकी सुमारे १०० किमी अंतराचा रेल्वेमार्ग माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातून जातो. हा प्रकल्प माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेच, मात्र या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा संपूर्ण मोबदला शेतकरी बांधवांना दिला जावा, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या निधीचा बजेटमध्ये समावेश होणे जरुरी आहे. या विस्तारीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाच्या कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर विसंगती आहे. ब्रिटिश काळात ही मीटरगेज लाईन होती, त्यास १९६७ मध्ये ब्रॉडगेज बनविण्यात आली. त्यावेळेला सर्व ठिकाणची वळणे काढून मार्ग सरळ करून घेतला होता; मात्र त्यानुसार जमिनींचे रेकॉर्ड अद्ययावत केले गेले नाही. त्यावेळी जमीन अधिग्रहण केली गेली की नाही, याचा ठोस आणि परिपूर्ण तपशील रेल्वे प्रशासनाकडे नाही. विस्तारिकरण प्रकल्पाच्या कामासाठी ज्या खासगी कंपनीने सर्व्हे केला, त्यांच्या रेकॉर्डमध्ये आणि भूमी अभिलेखच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

याविषयी संपूर्ण १०० किमी रेल्वेमार्गाचा सर्व्हे महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाने एकत्रितपणे करणे गरजेचे आहे. म्हणजे यातील असणारी तफावत दूर होईल. तसेच या सर्व्हेनंतर किती जमीन संपादित करावयाची, हे देखील निश्चित होईल. तसेच त्यासाठी देण्यात येणा-या निधीचा समावेश होणे जरूरी आहे.

या रेल्वेमार्गामुळे दोन्ही बाजूला असणा-या जमिनी, गावे, शहरे विभागली गेली आहेत. त्यामुळे येथे प्रत्येक दिवस रेल्वेमार्ग ओलांडल्याशिवाय जनजीवन चालू शकत नाही. परंतु पावसाळ्यात अनेक दिवस अंडरपास ब्रीज पाण्याखाली जातात. परिणामी ते बंद राहिल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे सर्व अंडरपास ब्रीज बारा महिने खुले ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच बोरगाव-टकले आणि लोणंद शहरातील अंडरपास ब्रीजसाठी रेल्वेने संपूर्ण खर्च उचलावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याशिवाय रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणीदेखील त्यांनी संसदेत केली.