शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कृषी सहायकांना विमा संरक्षण द्या - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:40 IST

सातारा : ‘खरिप हंगाम सुरू होणार असून, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना विमा ...

सातारा : ‘खरिप हंगाम सुरू होणार असून, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे,’ अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षीच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी ग्रामपातळीवर काम करत आहेत. कामाच्या स्वरूपामुळे त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कामे करावी लागत आहेत. गावपातळीवर प्रामुख्याने कृषी सहायक कामे करत असून, खरीप हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे काम करत असताना त्यांना कोणतेही विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने अनुचित घटना घडल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देण्यात आले नाही. यामुळे राज्य कृषी सहायक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, त्यामुळे त्यांना विमा कवच देण्याची गरज आहे.