शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना पाच वर्षे बिनव्याजी कर्ज द्या

By admin | Updated: September 26, 2015 00:39 IST

विजयसिंह मोहिते-पाटील : अनुदान मिळाले तरच ऊस उत्पादकांना योग्य दर देणे शक्य

फलटण : साखरधंद्यात स्पर्धा वाढली असून दर देण्यासाठी कारखानदार कर्ज काढत आहे, ही वस्तुस्थिती असली तरी केंद्र सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेताना पोत्यामागे एक हजार अनुदान दिले तरच ऊस उत्पादकांना दर देता येईल व कारखाने टिकतील. केंद्र सरकारने आतापर्यंत जी कारखान्यांना मदत केली ती एका हाताने करताना दुसऱ्या हाताने कर्जाची वसुलीही केली आहे. केंद्रसरकारने कारखान्यांना पाच वर्षांच्या बोलीवर बिनव्याजी कर्ज द्यावे व त्यानंतर व्याज लावावे अशी मागणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी या कारखान्याच्या ८३ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन खा. मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. डॉ. कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, मुंबई मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. विजयराव बोरावके, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील आदी उपस्थित होते.खा. मोहिते-पाटील म्हणाले, सध्या साखर कारखानदारी साखरेचे दर कोसळल्याने खूप अडचणीत आली आहे. ‘एफआरपी’चाही दर कारखानदार देऊ शकत नाही ही सद्य:परिस्थिती आहे. शरद पवार हे कृषिमंत्री असताना साखरेला भावही होता आणि त्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दरही देता येत होता. साखर निर्यात करताना पोत्यामागे एक हजार अनुदान दिल्यास परिस्थिती सुधारणार आहे. ते पुढे म्हणाले, न्यू फलटण शुगर वर्क्स सध्या अडचणीत असला तरी प्रल्हादराव पाटील यांच्या कल्पक नेतृत्त्वामुळे तो अडचणीतून बाहेर येईलच; पण एफआरपी एवढा दर देण्यातही आघाडीवर राहील.न्यू फलटण शुगर वर्क्सने ‘एफआरपी’प्रमाणे २१०० रुपये दर द्यायचे आहे. यापूर्वी १,८०० रुपये दर आपण दिला असून बँकांकडे कर्जासंदर्भातील प्रस्ताव मान्य होताच उरलेले ३०० रुपये देऊ. या हंगामात चार हजार मे. टनाने ६ लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रल्हादराव पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. विजय बोरावके, सुभाषराव शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रल्हादराव पाटील देशात एकमेव व्यक्ती साखर कारखान्याचे चेअरमनपद सांभाळताना कामगार युनियनचेही अध्यक्षपद सांभाळणारे प्रल्हादराव पाटील हे देशातील एकमेव व्यक्ती आहे. त्यांना ही कला कशी जमते असा सवाल मोहिते-पाटील यांनी करताच हशा पिकला.