शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
3
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
4
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
5
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
6
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
7
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
8
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
9
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
10
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
11
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
12
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
13
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
14
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
15
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
16
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
17
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
18
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
19
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
20
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'

कारखान्यांना पाच वर्षे बिनव्याजी कर्ज द्या

By admin | Updated: September 26, 2015 00:39 IST

विजयसिंह मोहिते-पाटील : अनुदान मिळाले तरच ऊस उत्पादकांना योग्य दर देणे शक्य

फलटण : साखरधंद्यात स्पर्धा वाढली असून दर देण्यासाठी कारखानदार कर्ज काढत आहे, ही वस्तुस्थिती असली तरी केंद्र सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेताना पोत्यामागे एक हजार अनुदान दिले तरच ऊस उत्पादकांना दर देता येईल व कारखाने टिकतील. केंद्र सरकारने आतापर्यंत जी कारखान्यांना मदत केली ती एका हाताने करताना दुसऱ्या हाताने कर्जाची वसुलीही केली आहे. केंद्रसरकारने कारखान्यांना पाच वर्षांच्या बोलीवर बिनव्याजी कर्ज द्यावे व त्यानंतर व्याज लावावे अशी मागणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी या कारखान्याच्या ८३ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन खा. मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. डॉ. कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, मुंबई मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. विजयराव बोरावके, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील आदी उपस्थित होते.खा. मोहिते-पाटील म्हणाले, सध्या साखर कारखानदारी साखरेचे दर कोसळल्याने खूप अडचणीत आली आहे. ‘एफआरपी’चाही दर कारखानदार देऊ शकत नाही ही सद्य:परिस्थिती आहे. शरद पवार हे कृषिमंत्री असताना साखरेला भावही होता आणि त्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दरही देता येत होता. साखर निर्यात करताना पोत्यामागे एक हजार अनुदान दिल्यास परिस्थिती सुधारणार आहे. ते पुढे म्हणाले, न्यू फलटण शुगर वर्क्स सध्या अडचणीत असला तरी प्रल्हादराव पाटील यांच्या कल्पक नेतृत्त्वामुळे तो अडचणीतून बाहेर येईलच; पण एफआरपी एवढा दर देण्यातही आघाडीवर राहील.न्यू फलटण शुगर वर्क्सने ‘एफआरपी’प्रमाणे २१०० रुपये दर द्यायचे आहे. यापूर्वी १,८०० रुपये दर आपण दिला असून बँकांकडे कर्जासंदर्भातील प्रस्ताव मान्य होताच उरलेले ३०० रुपये देऊ. या हंगामात चार हजार मे. टनाने ६ लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रल्हादराव पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. विजय बोरावके, सुभाषराव शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रल्हादराव पाटील देशात एकमेव व्यक्ती साखर कारखान्याचे चेअरमनपद सांभाळताना कामगार युनियनचेही अध्यक्षपद सांभाळणारे प्रल्हादराव पाटील हे देशातील एकमेव व्यक्ती आहे. त्यांना ही कला कशी जमते असा सवाल मोहिते-पाटील यांनी करताच हशा पिकला.