सातारा : ‘शासनाने वंचित घटकांना घर, जागा देण्याच्यादृष्टीने घोषणा केली आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी,’ अशी मागणी लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे.
सातारा येथील वंचित समाज मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी अनिल मोहिते, अजय राठोड, उज्वला जगदाळे, नलिनी घाडगे, सुजाता गायकवाड, रुपीता पवार, विमल शिंदे आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, ‘शासनाने २०२२ पर्यंत वंचित घटकाला घरकुल योजेनचा लाभ देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत जिल्ह्यातील प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही. अण्णाभाऊ साठे कृती समितीने जिल्ह्यातील अनेक समाजाचा सर्व्हे केला असून, लवकरच घरकूल परिषद घेणार आहे. त्यानंतर लोकांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.’
फोटो दि.१०सातारा घरकूल फोटो... (फोटो आवश्यक)
फोटो ओळ : सातारा येथील वंचित समाजाच्या मेळाव्यात उमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
.............................................................