शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

झिंगलेल्या बालकांचं जमावाकडून मुंडन

By admin | Updated: March 22, 2015 00:15 IST

तांदुळआळीतील धक्कादायक प्रकार : मद्यविक्रेत्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी

सातारा : मोठ्यांची नक्कल छोट्यांनी केली तर आई-वडील त्याचे कौतुक करतात. परंतु हिच नक्कल जर आपल्या मुलाने मद्यपी तळीरामाची केली तर आई-वडीलच नाही तर संपूर्ण समाजाला चिंतेत पाडणारी गोष्ट ठरते. असाच एक प्रकार शनिवारी येथील राजवाडा परिसरात घडला. येथील राजवाडा परिसरातील प्रतापसिंह महाराज नगरवाचनालयाजवळ तांदुळआळीत दुपारी बाराच्या सुमारास अवघ्या आठ-दहा वर्षांची चार बालके बसली होती. त्यांच्याजवळ पाण्याची बाटली आणि त्यामध्ये मद्य होते. तर एका कागदावर चकना शेंगदाणे-फुटाणे होते. आळीपाळीने ही बालके बाटलीतील मद्य पित होते. त्यानंतर शेंगदाणेही खात होते. काहीवेळानंतर त्यातील दोघांना उलट्या होऊ लागल्या. तेथे जवळच असलेल्या काही लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर नागरिकांनी त्या बालकांकडे ‘गाव कोणते, तुम्ही इथे कसे आलात,’ याविषयी चौकशी केली. परंतु त्या बालकांनी नागरिकांनाही थांगपत्ता लागू दिला नाही. ‘पोलिसांच्या ताब्यात देतो,’ असे ज्यावेळी त्यांना धमकावण्यात आले. तेव्हा त्यांनी आपली ओळख सांगितली. झालेला प्रकार त्यांच्या पालकांच्या कानावर घालण्यासाठी काहीनी फोनही लावले. परंतु त्यांच्या पालकांशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी या बालकांनी केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांचे मुंडन केले. नंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे यावेळी नागरिकांतून बोलले जात होते. लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी पालक लक्ष देतात; परंतु सध्या पोटापाण्यासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या पालकांच्या मुलांकडे कोण बघणार. आपली मुले दिवसभर काय करतात, याचा थांगपत्ता पालकांना नसतो. मुले शाळेत जातात, एवढेच समाधान आजच्या पालकांना आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)