शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

जखिणवाडी राज्याला आदर्श देईल : मुदगल

By admin | Updated: October 1, 2015 00:30 IST

भविष्यातही या गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

मलकापूर : ‘जखिणवाडी गावाने ऐक्यात सातत्य राखत विविध योजना यशस्वी केल्या आहेत. देशातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. शासनाच्या पातळीवरील विविध १३ पुरस्कार प्राप्त करून पुरस्कारांच्या रकमेतूनही गावाचाच विकास केला हा एक राज्यातील इतर गावांना आदर्श आहे. भविष्यातही या गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जखिणवाडी येथे भारतातील पहिल्या सौरग्राम प्रकल्पासह विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. मुदगल म्हणाले, ‘आदर्श गावाला अपेक्षित सुविधांसाठी निधी व योजना ‘तुम्ही मागा आम्ही देतो; मात्र युवा पिढीला उत्तम संस्कार व चांगले विचार देऊन सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. जखिणवाडीला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे. लाठी-काठी, दांडपट्टा यासारख्या मर्दानी खेळांची जोपासनाही या गावाने केली आहे. हा एक आदर्श आहे.’ सरपंच नरेंद्र पाटील यांनी पाच वर्षांत गावात यशस्वीपणे राबविलेल्या कोट्यवधींच्या योजनांची याशोगाथा सांगणारे पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना सुपूर्त केले. सर्व अधिकारी गावात एकत्र उपस्थित असल्याचे पाहून सरपंचांनी भक्त निवासासह पर्यटन क्षेत्रासाठी निधीची मागणी केली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रांताधिकारी किशोर पवार यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पाच लाख येणे आहे ते द्या... जखिणवाडीने आत्तापर्यंत १३ पुरस्कार मिळविले, त्यातून २५ लाखांची कामे बक्षिसाच्या रकमेतून केली. सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून सरपंच नरेंद्र पाटील यांनी एका उपक्रमासाठी गावाला पाच लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. मात्र, ती पाच लाखांची रक्कम अजून मिळालेली नाही, ते शासनाकडून येणे आहे ते द्या,’ अशी विनंती अधिकाऱ्यांना केली. आठ किलोमीटरचे पाणंद रस्ते खुलेगावाच्या दृष्टीने अडचणीचा विषय ठरलेले विविध ठिकाणचे आठ किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते खुले करण्यात आले. या पाणंद रस्त्याला सर्व शेतकऱ्यांनी विनामूल्य जागा देऊन एकमुखी संमती दिली. त्यापैकी काही रस्त्यांच्या खडीकरणाचाही भूमिपूजन समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.