शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

भातांच्या शिवारात घुमतेय भलरीची हाळी

By admin | Published: July 23, 2015 9:43 PM

बळीराजा शेतात व्यस्त : कास-बामणोली परिसरात भात लावणीस वेग

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या कास-बामणोली परिसरात भात लावणीस सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदांची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात शिवारात ‘रामा हो राम राम... रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरीमिरी झिरीमिरी...माज्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं... मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते...कुणाला तू ओढीत होतीस कुणाला तू सोडीत होतीस, वाईचे डोंगरी गजबारल्या तोरणी..’ अशा कित्येक पांरपरिक भलरी गीतांचा आवाज निनादू लागला आहे कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे . या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लालमाती व मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, वरी ही पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लालमातीच्या असल्यामुळे पिके चांगली येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर , जानेवारी महिन्यांत ऐन जांभळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळीनंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी भाताचे रोप तयार केले जाते. साधारणपणे २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पांरपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यातील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते .डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती व कागदांची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान, भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणताना दिसत आहेत. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सात पर्यंतही शेतातच मावळतो. (वार्ताहर)परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही तुरळक ठिकाणी अजूनही ओढे अथवा विहिरीतील पाणी साठवून भात लावणी होत आहे. भात लावणी करताना आजही ही पांरपरिक भलरी गीते या परिसरात अस्तित्व टिकवून आहेत, यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही. - अमोल भोसले, शेतकरी गोगवे, ता.महाबळेश्वरवस्तू अथवा पैशांचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात, यालाच या परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे .