शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

भातांच्या शिवारात घुमतेय भलरीची हाळी

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

बळीराजा शेतात व्यस्त : कास-बामणोली परिसरात भात लावणीस वेग

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या कास-बामणोली परिसरात भात लावणीस सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदांची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात शिवारात ‘रामा हो राम राम... रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरीमिरी झिरीमिरी...माज्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं... मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते...कुणाला तू ओढीत होतीस कुणाला तू सोडीत होतीस, वाईचे डोंगरी गजबारल्या तोरणी..’ अशा कित्येक पांरपरिक भलरी गीतांचा आवाज निनादू लागला आहे कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे . या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लालमाती व मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, वरी ही पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लालमातीच्या असल्यामुळे पिके चांगली येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर , जानेवारी महिन्यांत ऐन जांभळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळीनंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी भाताचे रोप तयार केले जाते. साधारणपणे २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पांरपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यातील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते .डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती व कागदांची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान, भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणताना दिसत आहेत. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सात पर्यंतही शेतातच मावळतो. (वार्ताहर)परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही तुरळक ठिकाणी अजूनही ओढे अथवा विहिरीतील पाणी साठवून भात लावणी होत आहे. भात लावणी करताना आजही ही पांरपरिक भलरी गीते या परिसरात अस्तित्व टिकवून आहेत, यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही. - अमोल भोसले, शेतकरी गोगवे, ता.महाबळेश्वरवस्तू अथवा पैशांचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात, यालाच या परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे .