शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
5
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
6
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
7
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
8
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
9
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
10
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
11
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
12
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
13
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
14
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
15
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
16
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
17
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
18
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
19
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
20
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका

घंटागाडी दारी... कचरा रस्त्यावरी

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

वडूज परिसरातील अवस्था : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

वडूज : देशात स्वच्छता मोहिमेचे वारे जोरात वाहत असताना इकडे वडूजमधील काही भागांत याचे महत्त्वच न समजल्याचे दिसते. ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. घंटागाडी दारी... तरी कचरा रस्त्यावरी, अशी अवस्था काही परिसरात आढळून येत आहे.आपले अंगण व आपला परिसर स्वच्छ असावा, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने स्वच्छता मोहीम राबविली. या पाठीमागचे कारण ही स्पष्ट असून, दिवसन्दिवस देशात आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम सर्व देशभर राबविली जात आहे. वडूजमधीलच काही घटक (माणसे) दर रविवारी स्वच्छता मोहीम न चुकता राबवित आहेत. काही भागांतील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. परंतु हे ढीग काढायचे कोणी? यावर एकमत न झाल्याने ढिगाऱ्यामध्ये कचऱ्याची वाढ होत आहे. वडूज परिसरातील अपुऱ्या नागरी सुविधा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे झपाट्याने होणारी घरे, दुकाने व दवाखाने यामुळे दैनंदिन स्वच्छता करताना ग्रामपंचायतीला मर्यादा पडत आहेत.वडूजमधील काही युवक हनुमान वॉर्डमध्ये वास्तव्यास आहेत. ते दर रविवारी या वॉर्डमधील स्वच्छता करीत असतात. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशा आशयाचा संदेश सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दखल घ्यायची कुणी. थेट ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून सर्वजण नामनिराळे होत आहेत. वडूज ग्रामपंचायतीकडे दोन घंटागाडी व ट्रॅक्टर-ट्रॉली असून, नऊ आरोग्य कर्मचारी असा ताफा आहे. मात्र दैनंदिन काही प्रमुख भागातील स्वच्छता (गटार काढणे), बाजार पटांगण लोटणे आदी कामातच आठवडा जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झाली आहे. इच्छाशक्ती असूनही ग्रामपंचायतीला हा अतिरिक्त भार पेलवेना. त्यामुळे गरज आहे ती वडूजकरांनी आपल्याच मानसिकतेत बदल करण्याची आणि स्वत:चा परिसर स्वत:च स्वच्छ करण्याची.दैनंदिन घंटागाडी प्रत्येक वॉर्डमधील गल्ली बोळातून फिरत असते; परंतु धगधगत्या जीवनात (स्वत:च निर्माण करून घेतलेल्या) घंटागाडी येण्याची वाट पाहण्या इतकासुद्धा वेळ नसलेल्या वडूजकरांनी काही परिसरातील सार्वजनिक, वादग्रस्त जागेत, गटारामध्ये कचरा टाकणे सोयीचे मानत आहेत. आपल्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून त्यांचे व स्वत:चे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. (प्रतिनिधी)नोटिसा बजावणारकाही भागात तोंडी सूचना देऊनही जाणीवपूर्वक कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून प्रथम नोटिसा बजावणार आहे. ग्रामस्थांकडून या प्रकरणी जर काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर प्रसंगी संबंधितांवर कठोर निर्णय घेणार असल्याचे सरपंच कांताताई बैले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.