शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पाहरा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

घंटागाडी दारी... कचरा रस्त्यावरी

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

वडूज परिसरातील अवस्था : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

वडूज : देशात स्वच्छता मोहिमेचे वारे जोरात वाहत असताना इकडे वडूजमधील काही भागांत याचे महत्त्वच न समजल्याचे दिसते. ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. घंटागाडी दारी... तरी कचरा रस्त्यावरी, अशी अवस्था काही परिसरात आढळून येत आहे.आपले अंगण व आपला परिसर स्वच्छ असावा, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने स्वच्छता मोहीम राबविली. या पाठीमागचे कारण ही स्पष्ट असून, दिवसन्दिवस देशात आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम सर्व देशभर राबविली जात आहे. वडूजमधीलच काही घटक (माणसे) दर रविवारी स्वच्छता मोहीम न चुकता राबवित आहेत. काही भागांतील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. परंतु हे ढीग काढायचे कोणी? यावर एकमत न झाल्याने ढिगाऱ्यामध्ये कचऱ्याची वाढ होत आहे. वडूज परिसरातील अपुऱ्या नागरी सुविधा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे झपाट्याने होणारी घरे, दुकाने व दवाखाने यामुळे दैनंदिन स्वच्छता करताना ग्रामपंचायतीला मर्यादा पडत आहेत.वडूजमधील काही युवक हनुमान वॉर्डमध्ये वास्तव्यास आहेत. ते दर रविवारी या वॉर्डमधील स्वच्छता करीत असतात. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशा आशयाचा संदेश सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दखल घ्यायची कुणी. थेट ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून सर्वजण नामनिराळे होत आहेत. वडूज ग्रामपंचायतीकडे दोन घंटागाडी व ट्रॅक्टर-ट्रॉली असून, नऊ आरोग्य कर्मचारी असा ताफा आहे. मात्र दैनंदिन काही प्रमुख भागातील स्वच्छता (गटार काढणे), बाजार पटांगण लोटणे आदी कामातच आठवडा जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झाली आहे. इच्छाशक्ती असूनही ग्रामपंचायतीला हा अतिरिक्त भार पेलवेना. त्यामुळे गरज आहे ती वडूजकरांनी आपल्याच मानसिकतेत बदल करण्याची आणि स्वत:चा परिसर स्वत:च स्वच्छ करण्याची.दैनंदिन घंटागाडी प्रत्येक वॉर्डमधील गल्ली बोळातून फिरत असते; परंतु धगधगत्या जीवनात (स्वत:च निर्माण करून घेतलेल्या) घंटागाडी येण्याची वाट पाहण्या इतकासुद्धा वेळ नसलेल्या वडूजकरांनी काही परिसरातील सार्वजनिक, वादग्रस्त जागेत, गटारामध्ये कचरा टाकणे सोयीचे मानत आहेत. आपल्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून त्यांचे व स्वत:चे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. (प्रतिनिधी)नोटिसा बजावणारकाही भागात तोंडी सूचना देऊनही जाणीवपूर्वक कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून प्रथम नोटिसा बजावणार आहे. ग्रामस्थांकडून या प्रकरणी जर काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर प्रसंगी संबंधितांवर कठोर निर्णय घेणार असल्याचे सरपंच कांताताई बैले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.