शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
5
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
6
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
7
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
8
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
9
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
10
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
11
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
12
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
13
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
14
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
15
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
16
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
17
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
18
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
19
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
20
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

घंटागाडी दारी... कचरा रस्त्यावरी

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

वडूज परिसरातील अवस्था : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

वडूज : देशात स्वच्छता मोहिमेचे वारे जोरात वाहत असताना इकडे वडूजमधील काही भागांत याचे महत्त्वच न समजल्याचे दिसते. ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. घंटागाडी दारी... तरी कचरा रस्त्यावरी, अशी अवस्था काही परिसरात आढळून येत आहे.आपले अंगण व आपला परिसर स्वच्छ असावा, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने स्वच्छता मोहीम राबविली. या पाठीमागचे कारण ही स्पष्ट असून, दिवसन्दिवस देशात आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम सर्व देशभर राबविली जात आहे. वडूजमधीलच काही घटक (माणसे) दर रविवारी स्वच्छता मोहीम न चुकता राबवित आहेत. काही भागांतील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. परंतु हे ढीग काढायचे कोणी? यावर एकमत न झाल्याने ढिगाऱ्यामध्ये कचऱ्याची वाढ होत आहे. वडूज परिसरातील अपुऱ्या नागरी सुविधा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे झपाट्याने होणारी घरे, दुकाने व दवाखाने यामुळे दैनंदिन स्वच्छता करताना ग्रामपंचायतीला मर्यादा पडत आहेत.वडूजमधील काही युवक हनुमान वॉर्डमध्ये वास्तव्यास आहेत. ते दर रविवारी या वॉर्डमधील स्वच्छता करीत असतात. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशा आशयाचा संदेश सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दखल घ्यायची कुणी. थेट ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून सर्वजण नामनिराळे होत आहेत. वडूज ग्रामपंचायतीकडे दोन घंटागाडी व ट्रॅक्टर-ट्रॉली असून, नऊ आरोग्य कर्मचारी असा ताफा आहे. मात्र दैनंदिन काही प्रमुख भागातील स्वच्छता (गटार काढणे), बाजार पटांगण लोटणे आदी कामातच आठवडा जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झाली आहे. इच्छाशक्ती असूनही ग्रामपंचायतीला हा अतिरिक्त भार पेलवेना. त्यामुळे गरज आहे ती वडूजकरांनी आपल्याच मानसिकतेत बदल करण्याची आणि स्वत:चा परिसर स्वत:च स्वच्छ करण्याची.दैनंदिन घंटागाडी प्रत्येक वॉर्डमधील गल्ली बोळातून फिरत असते; परंतु धगधगत्या जीवनात (स्वत:च निर्माण करून घेतलेल्या) घंटागाडी येण्याची वाट पाहण्या इतकासुद्धा वेळ नसलेल्या वडूजकरांनी काही परिसरातील सार्वजनिक, वादग्रस्त जागेत, गटारामध्ये कचरा टाकणे सोयीचे मानत आहेत. आपल्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून त्यांचे व स्वत:चे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. (प्रतिनिधी)नोटिसा बजावणारकाही भागात तोंडी सूचना देऊनही जाणीवपूर्वक कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून प्रथम नोटिसा बजावणार आहे. ग्रामस्थांकडून या प्रकरणी जर काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर प्रसंगी संबंधितांवर कठोर निर्णय घेणार असल्याचे सरपंच कांताताई बैले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.