शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वडाचे म्हसवे गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा

By admin | Updated: May 11, 2017 18:06 IST

जावळीच्या सभापतींची मागणी : शिवेंंद्रसिंहराजेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

आॅनलाईन लोकमतसायगाव (सातारा), दि. ११ : जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे गावात जवळपास अडीच हेक्टर क्षेत्रात प्राचीन महाकाय वडाचे झाड आहे.या झाडाची ब्रिटिश गव्हर्नर ली वॉरनेर ने पाहणी करून याची रेशिडन्सी आॅफ रेकॉर्ड मध्ये आशिया खंडातील सर्वात महाकाय वडाचे झाड अशी नोंद केली आहे.येथे पर्यटक,निसर्गप्रेमी,वन्यजीवप्रेमी वनस्पती शास्त्रज्ञ यांची वर्दळ राहते. त्यामुळे या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जावा अशी मागणी या गावच्या स्नुषा विद्यमान सभापती अरुणाताई शिर्के यांनी केली आहे. त्यावर तात्काळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतचे पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.अतिशय प्राचीन असे हे महाकाय वडाचे झाड या गावात आहे.मुख्य झाडापासून अनेक वडाची झाडे निर्माण होऊन जवळपास सहा एकरमध्ये महाकाय वड येथे आहेत.त्यामुळे या गावाला वडाचे म्हसवे म्हणून ओळखले जाते.ब्रिटिश गव्हर्नर ली वॉरनेर ने याठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आश्चर्यचकित होऊन आशिया खंडात असा महाकाय वड नसावा म्हणून याची नोंद देखील केली आहे. सध्या हा परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे; परंतु वनविभागाकडून या परिसराची म्हणावी तेव्हडी देखभाल होत नाही.तसेच पर्यटकांना सुविधा देखील पुरवल्या जात नाहीत. महाकाय वडाच्या झाडाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून निसर्गप्रेमी,वन्यजीव प्रेमी, पर्यटक, अभ्यासक या गावाला भेट देत असतात.त्यामुळे सतत पर्यटकांची वर्दळ राहते. परंतु त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्यामुळे पर्यटकांची निराशा होते. या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास पर्यटकांची गर्दी वाढून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल.व अन्नसाखळी जपणाऱ्या या प्राचीन वडाचे जतन देखील होईल. यासाठी गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी सभापती अरुणाताई शिर्के यांनी पाठपुरावा सुरु पाठपुरावा सुरु केला आहे. त्यादृष्टीने तात्काळ आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले यांनी देखील पालकमंत्री विजय शिवतारे,जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन २0१७- १८ च्या नियोजन आराखड्यात या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच या गावाला पर्यटन स्थळात समावेश होणार हे निश्चित.निधी मिळाल्यास विकासाची संधी उपलब्ध

सहा एकरमध्ये विस्तारलेल्या महाकाय वडाच्या झाडाचा हा परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे.वनविभागाच्या दुर्लक्षामुळे मध्यन्तरी येथे झाडाच्या खोडाना आग लावण्याचा प्रयत्न झाला झाला होता.निसगार्चा हा अनमोल ठेवा चिरंतन ठेवण्यासाठी गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला तर निधी उपलब्ध होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाचा विकास साधला जाईल,त्यामुळे पर्यटन स्थळात म्हसवे गावाचा समावेश व्हावा अशी मागणी ग्रामस्थांमधून देखील होत आहे.वडाच्या झाडांमुळे वडाचे म्हसवे गावाला एक वेगळे महत्व आहे.निर्सगाबाबत समाजात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.त्यामुळे दुर्मिळ वडाचे वृक्षांचे जतन व्हावे.तसेच पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.त्यामुळे वडाचे म्हसवे गावातील निसगार्चा हा ठेवा चिरंतन जतन ठेवण्यासाठी शासनाने या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दयावा या साठी पाठपुरावा करणार."- आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ.