शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

अधिकाऱ्यांना पाण्यासाठी घागरीसह पळवा !

By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST

जयकुमारांचा अधिवेशनात घणाघात : टँकर अन् छावण्या सुरू करा

सातारा : ‘सध्याच्या भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. बळीराजा आणि पशुधन पाण्यासाठी टाहो फोडत आहे. इतकी भयानक परिस्थिती असूनही सरकार मात्र दुष्काळी उपाययोजनांबाबत कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत आहे. अधिकारी जनतेशी प्रतारणा करत आहेत. अधिकाऱ्यांना तीन-चार किलोमीटरवरून पाणी आणायला सांगा,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळावरील चर्चेदरम्यान केला. आमदार गोरे म्हणाले, ‘पाठीमागच्या सरकारने दुष्काळात अनेक चांगले निर्णय घेत बऱ्याच उपाययोजनाही केल्या होत्या. पाणी प्रश्नावरून मागेल तिथे टँकर आणि पशुधनासाठी चारा छावण्या दिल्या होत्या. त्यासाठी जाचक अटी घालून कागदी घोडे नाचविले नव्हते. सध्याचे सरकार मात्र दुष्काळाबाबत गंभीर नाही. माझ्या माण-खटावमध्ये आज भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. परंतु जनावरांसाठी एकही छावणी सुरू करण्यात आली नाही. मुंबईतून छावण्यांचा आदेश निघाला आहे. मुख्यमंत्रीही तसे सांगत आहेत. मात्र आमच्याकडे अद्याप छावण्या सुरू नाहीत. छावणीसाठी ५०० जनावरांची जाचक अट घालण्यात आली आहे. ५०० जनावरे नसतील तर छावणीच सुरू करता येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दिलेले टँकरचे प्रस्ताव तीन-तीन महिने पडून राहत आहेत. गावातील पाण्याचे सगळे स्रोत संपले आहेत. तीन-चार किलोमीटरवर एखाद्या बोअरवेलला थोडेफार पाणी असेल तर तलाठी अधिग्रहण प्रस्ताववर पाठवत आहेत. तहसीलदार त्यामुळे टँकर प्रस्ताव मान्य करीत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना तीन-चार किलोमीटरवरून पाणी आणायला सांगा म्हणजे जनतेच्या हालअपेष्टा कळतील,’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी) निकषात बसणाऱ्या आत्महत्या कराव्यात का?माझ्या माण-खटावच्या भागातील शेतकरी कायम संघर्ष करत दुष्काळी परिस्थितीला धैर्याने तोंड देत आला आहे. आमच्या भागात सहसा शेतकरी आत्महत्या होत नाहीत. पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी परिस्थितीशी हार मानून एका बळीराजाने आपली जीवनयात्रा संपविली. त्या शेतकऱ्याला शासनाची मदत मिळण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यासंदर्भात तहसीलदारांनी ती आत्महत्या निकषात बसत नसल्याचे मला सांगितले. आता शेतकऱ्यांनी आमच्या निकषात बसणाऱ्या आत्महत्या कराव्यात असा नवीन अध्यादेश सरकारने काढावा, असा टोलाही आमदार गोरेंनी लगावला.