शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

गुढीसाठी लोणंदच्या साखरेच्या आकर्षक गाठी सज्ज

By admin | Updated: March 27, 2017 11:00 IST

मिठाई व्यावसायिक व्यस्त : लाकडी साच्यातील पारंपारिक पध्दत

आॅनलाईन लोकमतकापडगाव : मराठी नववषार्चा पहिला दिवस म्हणजे चैत्री पाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी संकल्पाची, मांगल्याची, समृद्धीची, नवचैतन्याची गुढी उभारली जाते. या गुढीला साखरेचा हार म्हणजेच साखरेपासून तयार केलेल्या गाठी घालण्याची परंपरा आहे. लोणंदमधील काही मिठाई व्यावसायिक सध्या या गाठी बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गाठी बनवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. कारण कारखान्यामधून मशीनवर बनवलेल्या गाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने लाकडी साच्यामध्ये बनवलेल्या गाठी आकर्षक असतात. सध्या साखरेच्या दरात वाढ झाल्याने गाठीचे दरही किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढलेले आहेत.

बाजारात या साखरेच्या गाठी उपलब्ध झाल्या असून, नवीन वर्षाच्या नव्या संकल्पना साकारण्यासाठी साखरेची गाठी बांधून गुढी उभारण्यासाठी गाठी खरेदी करण्यासाठी लोणंदमध्ये गर्दी होत आहे.गाठी बनविण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार केला जातो. हा पाक घोटवून ज्या साईजमध्ये गाठी बनवायची आहे, त्या लाकडी साच्यामध्ये हा पाक ओतला जातो. वेगवेगळ्या साईजमध्ये व वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या वजनाच्या गाठी बनविण्यासाठी अनेक लाकडी साच्यांचा उपयोग केला जातो. १०० किलो साखरेमध्ये अंदाजे ९५ किलो गाठी तयार होतात. - बाळू पवार, आचारी