शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गस्त म्हटलं की अंगावर येतो काटा!

By admin | Updated: June 10, 2015 00:24 IST

केसुर्डीकरांना वाईट अनुभव : गेल्या महिन्यात संशयितास पकडून दिल्यानंतर ग्रामस्थांवरच झाले गुन्हे दाखल

शिरवळ : ‘रात्रगस्त तेही केसुर्डीमध्ये’ नको रे बाबा कोणी सांगितले आहे, पोलिसांचे झंझट मागे लावायला. त्यापेक्षा चोरी झाली तर आक्रोशच करावा लागेल ना...’ असे उद्गार आहेत. केसुर्डीमधील तरुण व ग्रामस्थांचे गावाकडे वळाली नसेल तर नवलच कारण गेल्या अनेक दिवसांपासून केसुर्डी याठिकाणी चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. ८ मे रोजी ही केसुर्डीमधील प्रवीण पोपट ढमाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडत सुमारे ५ लाखांच्या आसपास सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या संबंधित चोरट्यांचा तपासही आजतागायत पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे लहान-मोठ्या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी केसुर्डी येथे तरुणांनी व ग्रामस्थांनी पोलीसांच्या मदतीने गावात चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी रात्रगस्तीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय केसुर्डी येथल तरुणांच्या व ग्रामस्थांच्या अंगलट आलेला दिसून येत आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार व पोलीस अधीक्षकाला दिलेल्या निवेदनानुसार, चोरीच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी रात्रगस्त सुरू असताना रात्री दीड ते दोनच्या दरम्यान गावात मोटारसायकलवरून (बिगर नंबरच्या) एकजण संशयास्पदरित्या गावात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधिताला हटकले असता तो पळाला. त्याचा पाठलाग करीत असताना तो आडमार्गाने घुसल्याने संबंधित इसम हा मोटारसायकलवरुन जोरदार पडला व त्याला दुखापत झाली. दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधिताला पोलिसांच्या स्वाधीन करीत संबंधिताकडे आढळून आलेली बंदुक व इतर साहित्यही पोलिसांच्या स्वाधीन केले असे.असे असतानाही संबंधिताने काही दिवसानंतर केसुर्डी येथील काही तरुणांविरुद्ध व ग्रामस्थांविरुद्ध खोटी फिर्याद दिली असल्याचा आरोप केसुर्डी ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे केसुर्डी ग्रामस्थावर अन्याय झाला असल्याची भावना केसुर्डीकरामध्ये निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)केसुर्डी गावामध्ये औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. याठिकाणच्या नागरिकांकडे मुबलक पैसा असल्याची भावना चोरट्यांमध्ये निर्माण झाल्याने चोरट्यांनी केसुर्डी गावाला लक्ष केले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.- रवी ढमाळ, केसुडीरात्रगस्त बंदकेसुर्डी ग्रामस्थांनी रात्रगस्तही गावातील बंद करुन टाकली आहे. याचाच परिपाक म्हणजे आज झालेली सुमारे १२ तोळेच्या आसपास सोने-चांदीच्या दागिन्यांची रोख रकमेची चोरी त्यामुळे रात्रगस्त म्हटले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये केसुर्डी ग्रामस्थांच्या अंगावर काटा येत असून नसती झंझट मागे नको म्हणत केसुर्डी ग्रामस्थ काढता पाय घेत आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा हा राजकीय दबावामुळे दाखल झाला असल्याचा आरोपही केसुर्डी ग्रामस्थांनी केला आहे.