शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गारेगार ‘चिल्लर’मध्ये; पण कष्ट ‘लाख’मोलाचं !

By admin | Updated: April 15, 2016 23:27 IST

शंभर रुपयांसाठी मैलोनमैल पायपीट : दुकानदारांकडून खरेदी केलेल्या कांड्या पोहोचतायत गावोगावी; कऱ्हाडात दीडशेहून अधिक विक्रेते

कऱ्हाड : उन्हाळा वाढलाय. कधी नव्हे ते पारा चाळीस अंशांवर पोहोचलाय. या कडक उन्हात गारेगारची कांडी मिळावी, अशी प्रत्येकालाच अपेक्षा असते. गावोगावी फिरणारे विक्रेते सामान्यांची गारव्याची ही अपेक्षा पूर्णही करतात. पाच ते दहा रुपयांना ते गारेगार विकतात; पण चिल्लरमध्ये विकल्या जाणाऱ्या या गारेगारचं खरं ंंंअर्थकारण समोर आलंच तर ते थक्क करणारं असंच आहे.चार-दोन रुपयाला मिळणारी आईसकांडी तशी लाखमोलाची; पण ती खाणारा तीचं मोल फक्त पैशातंच मोजतो. या आईसकांडीची खरी किंमत विकणाऱ्याला समजते. कष्टाच्या स्वरूपात ती किंमत त्यालाच मोजावी लागते. कऱ्हाडात अशी काही कुटुंब आहेत की, जी फक्त हातगाडीवर आईसकांडी विकून मिळणाऱ्या पैशात गुजराण करतायत. अशा कुटुंबातील काहींच्या दोन पिढ्या याच व्यवसायात गेल्यात. मात्र, तरीही दुसऱ्याला थंडावा देण्यासाठी हा हातगाडीवाला दररोज किमान पंचवीस किलोमीटरची पायपीट करतोय. उन्हाचे चटके सोसतोय आणि कमावतोय फक्त शंभर ते दीडशे रुपये.एखादी आईसकांडी विकत घेतल्यानंतर उत्सुकतेपोटी त्या विक्रेत्याच्या फायद्या-तोट्याचं गणित अनेकांनी मनोमन मांडलं असेल; पण आपण जे गणित करतो त्याहीपलीकडे या आईसकांडीच आणि त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच अर्थकारण चालतं. आईसकांडी ताब्यात घेतल्यापासून ते उरलेल्या कांड्या दुकानदाराला परत करेपर्यंत त्या विक्रेत्याला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवावा लागतो. एक-एक रुपया आणि ज्यांनी हे भांडवल दिलं तो दुकानदार, या दोन्ही गोष्टी विक्रेत्यासाठी महत्त्वाच्या असतात. वास्तविक, गावोगावी जाऊन आईसकांडी विकणारे स्वत: या कांड्या तयार करीत नाहीत. एखाद्या दुकानदाराकडून त्या कांड्या संबंधित विक्रेता घेतो. आसपासच्या गावात जाऊन दिवसभर तो त्या खपवितो आणि मिळालेल्या पैशातून दुकानदाराला कांड्यांची खरेदी किंमत देऊन उरलेली कमाई खिशात घालून मार्गस्थ होतो. कऱ्हाडच्या बुधवार पेठेतही विक्रेत्यांना आईसकांडी पुरविणारे काही दुकानदार आहेत. संबंधित दुकानदारांनी स्वत: हातगाडेही बनवून घेतलेत. ज्यांना कामधंदा नाही आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी अजिबात भांडवलही नाही, अशांना हे दुकानदार आपला हातगाडा देतात. त्याबरोबर दररोज सकाळी काही ठराविक आईसकांडीही देतात. दिवसभर त्या विक्रेत्याने ग्रामीण भागात आईसकांडी विकायची. सायंकाळी उरलेल्या कांड्यांसह गाडा दुकान मालकाच्या ताब्यात द्यायचा आणि आपली कमाई घेऊन घर गाठायचं, असा येथील दिनक्रम आहे. ‘आईसकांडीच्या पैशातून काही कुटुंब रोजीरोटी चालवितात. त्यांचा संसार चालतो, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतोय. सध्या या व्यवसायात पूर्वीसारखी मजा नाही; पण उन्हाळ्यात या आईसकांडीमुळेच काही कुटुंबे स्वत:ची गुजराण करतात. आमच्याकडून आईसकांडी नेऊन गावोगावी त्याची विक्री करणाऱ्यांपैकी काहींच्या दोन पिढ्या यात गेल्यात. काहीजण निराधार आहेत तर काही अपंग; पण त्यांनाया व्यवसायानं खऱ्या अर्थानं पाठबळ दिलंय,’ असे दुकानदार सांगतात. (प्रतिनिधी)मिल्ककांडीला जास्त पसंती...कऱ्हाडच्या बुधवार पेठेतील दुकानदार आईसकांडी व मिल्ककांडी या दोन प्रकारच्या कांड्या तयार करतात. त्यापैकी मिल्ककांडीला ग्राहकांकडून जास्त पसंती मिळते. आईसकांडीपेक्षा या कांडीची किंमतही थोडी जास्त असते. मात्र, विक्री जास्त होत असल्याने हातगाडीवाले आईसकांडीपेक्षा मिल्ककांडीच जास्त घेतात. खरेदी-विक्रीचा हिशोबआईसकांडीची विक्री करून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा सर्व हातगाडीवाले दुकानाच्या ठिकाणी येतात. दुकानातून ट्रे घेऊन उरलेल्या कांड्या त्यामध्ये भरतात. दुकानदाराला विक्री झालेल्या व शिल्लक कांड्यांचा हिशोब दिला जातो. ठराविक रक्कम दुकानदाराला देऊन विक्रेते आपल्या घराकडे निघून जातात. सकाळीच होते व्यवसायाला सुरुवातदररोज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्व विक्रेते दुकानाच्या ठिकाणी येतात. दुकानदाराकडून शंभर ते दीडशे आईसकांडी घेतात. त्या कांडी व बर्फ दुकानासमोर उभ्या असलेल्या हातगाड्यामध्ये भरतात आणि वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होतात. एकाचवेळी पंचवीस ते तीस हातगाडे शहरातील बुधवार पेठेतून बाहेर पडतात.