शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तिकाटणे येथील कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST

रिफ्लेक्टरची मागणी मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. ...

रिफ्लेक्टरची मागणी

मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.

दुभाजकात गवत वाढले

ओगलेवाडी : ओगलेवाडी रेल्वे स्टेशन ते ओगलेवाडी येथील दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. तसेच काही ठिकाणी दुभाजक ढासळलेलेही आहेत. याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुभाजकातील वाढलेल्या गवतामुळे त्याचे सौंदर्य नाहीसे होत आहे. तर ओगलेवाडी रेल्वे पूल ते कृष्णानाका येथील मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात आदळ आपट होत आहे.

पाणंद रस्त्याची दुरवस्था

तांबवे : किरपे-सुपने येथील पाणंद रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, तोही सध्या निघून गेला असून, रस्त्यावर सध्या खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. किरपे-सुपने या दोन्ही गावांना जोडणारा हा पाणंद रस्ता असून, या रस्त्याचा वापर हा येणके, तांबवे, कोळे, किरपे येथील ग्रामस्थ तसेच प्रवाशांकडून वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

विद्यार्थ्यांचा पायी प्रवास

पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. या ठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

वाहनचालक त्रस्त

कोयनानगर : मोरणा भागात येणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांची बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे. या विभागातील प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

फलक नसल्याने फसगत

कऱ्हाड : वाठार, रेठरे बुद्रुक ते शेणोली स्टेशन या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांची तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वाठार ते रेठरे बुद्रुक जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. महामार्गावरून येणारी आणि कृष्णा कारखान्याकडे जाणारी वाहने याच मार्गावरून मार्गस्थ होतात. मात्र, या मार्गावर कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. दिशादर्शक फलकांअभावी नवीन वाहन चालकांची फसगत होत आहे.