शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पाटण तिकाटणे येथील कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा ...

कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा पडत असून, याबाबत संबंधित विभागाकडून काही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. कचऱ्यामध्ये अधूनमधून आग लागण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मांस, अन्नपदार्थ तसेच घरगुती कचरा या ठिकाणी पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याच्या कोंडाळ्याभोवती श्वानही घुटमळत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. मोकाट श्वान नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर रिफ्लेक्टरची मागणी

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी सूचना तसेच दिशादर्शक फलक आहेत. मात्र, या फलकांना झुडपांनी वेढा घातला आहे. त्यामुळे ते चालकांच्या दृष्टीस पडत नाहीत. दुभाजकात गवत वाढल्यामुळे हे फलक असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. संबंधित विभागाने रिफ्लेक्टर आणि फलक लावण्याची मागणी होत आहे.

साथरोगाची शक्यता; गावोगावी जनजागृती

कऱ्हाड : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथ रोग पसरत आहेत. या रोगांपासून बचाव करून आरोग्य जपण्याचा तसेच पाणी उकळून पिणे, नियमित औषधे घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. दिवसा उकाडा व रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या हॉस्पिटलही फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काही गावांमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत. ही परिस्थिती इतर गावांत उद्भवू नये, यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.

डोंगर पठारावरील विद्यार्थ्यांचा पायी प्रवास

पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. या ठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. लोकप्रतिनिधीही मते मागण्यासाठी या विभागात जातात. त्या वेळी सुविधा पुरविण्याची पोकळ आश्वासने त्यांच्याकडून देण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही केली जात नाही. विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कार्वे विभागामध्ये ऊसतोडींना आला वेग

कार्वे : शेरे, दुशेरे, कोरेगाव विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करत थंडीमुळे ऊसतोड करून रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊसतोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.