शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वाहनांची चाके थांबल्याने गॅरेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सर्वसामान्य नागरिकांना संचारबंदीचा जसा फटका बसला, तसाच फटका गॅरेज चालक व वाहनधारकांनादेखील बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सर्वसामान्य नागरिकांना संचारबंदीचा जसा फटका बसला, तसाच फटका गॅरेज चालक व वाहनधारकांनादेखील बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून लाखो वाहने एकाच जागी उभी आहेत. त्यामुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर गॅरेज बंद असल्याने गॅरेज चालक व तेथील कारागिरांची उपासमार सुरू आहे.

सातारा जिल्हा राज्यात रेड झोनमध्ये गेलेला आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले जात आहेत. या संचारबंदीची झळ हातगाडीधारक, किरकोळ विक्रेते, फळ विक्रेते व हातावर पोट असणाऱ्यांना बसली. तसेच वाहनधारक व गॅरेज चालकांनादेखील याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

संचारबंदीमुळे जिल्ह्यातील सर्व गॅरेज सध्या बंद आहेत. शिवाय लाखो रुपयांची वाहने पार्किंग व रस्त्यावर उभी आहेत. जी वाहने रस्त्यावर धावत आहेत त्यांच्यात काही बिघाड झाला तर दुरुस्ती कुठे करायची, हा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या वाहनांमध्येदेखील इंजिन, बॅटरी व इतर तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. एकीकडे वाहनचालकांचे नुकसान तर दुसरीकडे गॅरेजचालकांनी उपासमार अशी परिस्थिती संचारबंदीत निर्माण झाली आहे.

(चौकट)

वाहने पार्किंगमध्ये

संचारबंदीचा फटका वाहनांनादेखील बसला आहे. कोणाच्या गाड्या पार्किंगमध्ये तर कोणाच्या रस्त्यावरच उभ्या आहेत. गाडी चालली नाही तर इंजिनला फटका बसू शकतो. हे नुकसान कोण भरून काढणार? आम्ही संचारबंदीचे काटेकोर पालन करीत आहोत. केवळ कामासाठीच घराबाहेर जात होतो. गेल्या दीड महिन्यात गाडीचा कमीतकमी वापर केला. आता तर गाडी पार्किंगमध्ये पडून आहे. गाडी बंद असल्याने बॅटरीचे नुकसान होत आहे, असे मत वाहनधारकांनी व्यक्त केले.

(चौकट)

वाहनधारकांसमोर अडचणींचा डोंगर

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. कारवाईच्या धास्तीने बहुतांश वाहनधारकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. अनेकांच्या घरात ५० हजारांपासून ५० लाखांपर्यंतच्या गाड्या आहेत. या सर्व गाड्या गेल्या एक - दीड महिन्यापासून जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांसमोर अडचणींचा डोंगर वाढू लागला आहे.

(चौकट)

गॅरेज बंद असल्याने अडचणी

जिल्ह्यात दहा लाखांच्या आसपास वाहने आहेत. संचारबंदीच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेशी निगडित वाहने रस्त्यावरून धावत आहेत. टायर पंक्चर होणे, इंजिन बंद पडणे, बॅटरीत बिघाड होणे अशा अनेक अडचणींना वाहनधारकांना तोंड द्यावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने एखादे वाहन जर बंद पडले तर करायचे काय, असा प्रश्न अनेकांपुढे उभा राहत आहे.

(कोट)

आमच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सततच्या संचारबंदीमुळे गॅरेज व्यवसाय पूर्णतः बंद झाला आहे. शासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. घरखर्च भागविणे सध्यातरी जिकिरीचे बनले आहे.

- अमित शिंदे, सातारा

(चौकट)

आमच्या गॅरेजमध्ये ग्रामीण भागातील दोन-तीन मुले काम करतात. संचारबंदीचा आम्हाला व कारागिरांना मोठा फटका बसला आहे. शासनाने गॅरेज सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.

- राहुल उतेकर, महाबळेश्वर

* आकडेवारीची चौकट देणार आहे.

* डमी ७४२ : २५ सचिन टेम्पलेट/ प्रूफ