शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गांधी, विनोबांचे सर्वोदयी विचार बळकटीचा निर्धार

By admin | Updated: December 1, 2015 00:12 IST

भुर्इंज : किसन वीर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्ता शिबिर उत्साहात

भुर्इंज : देशाच्या बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचे शांतता, अहिंसा, सुधारणावादी, परिवर्तनवादी, सर्वोदयी विचार मागे पडू लागले आहेत. भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या वाई आगमनाच्या शताब्दी वर्षात गांधी-विनोबांचे गांधीवादी व सर्वोदयी विचार सातारा जिल्ह्यासह राज्य-देशात अधिक बळकट करू या, असा निर्धार करण्यात आला. भुर्इंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दोन दिवसीय सर्वोदयी कार्यकर्ता शिबिरात हा निर्धार करण्यात आला. अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ रोडे, माजी अध्यक्ष व वर्धा येथील सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष व नई तालीम संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, माजी अध्यक्ष शंकर बगाडे, विचारवेध संमेलनाचे प्रवर्तक किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ सर्वोदयी कार्येकर्ते रसिकलाल गांधी, श्री कोटेश्वर देव ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त विजय दिवाण व सर्वोदयी कार्यकर्त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या आचार्य विनोबा भावेंनी शासन व शोषणमुक्त अहिंसक समाजरचनेसाठी सर्वोदय समाज संघटनेची स्थापना १९४८ मध्ये केली. जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकचंद दोशी, लालासाहेब इंगळे, डॉ. वा. वि. आठल्ये, रामानंद भारती आदींनी सातारा जिल्ह्यात सर्वोदय समाजाचे कार्य सुरू केले. बाबूलाल गांधी, अण्णासाहेब जाधव, तात्या दीक्षित, दिनकरराव भोसले, किसन जाधव या तरुण मंडळींनी तत्कालीन परिस्थितीत सातारा जिल्ह्यात सर्वोदयाच्या कार्याला गती दिली. १९५३ ते १९७३ या दोन दशकांत जिल्ह्यातील सर्वोदय चळवळीचे काम संघटितरीत्या मोठ्या प्रमाणात झाले. त्यानंतर या चळवळीतील जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांना वयोमानाने सर्वोदयी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यास मर्यादा आल्या. सर्वोदयी कार्यकर्ते विखुरले जाऊन या चळवळीचे काम जवळजवळ मंदावले. या शिबिरात अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचे सचिव शेख हुसेन, महामंत्री चंद्रकांत चौधरी, सेवाग्राम आश्रमचे सचिव श्रीराम जाधव, मंत्री शोभा शिरढोणकर, सहकार चळवळीचे अभ्यासक अशोक काळे, सर्वोदयी कार्यकर्ते बाबूलाल गांधी, चेतना सिन्हा, रसिकलाल दोशी, जीवन इंगळे, बाबासाहेब इनामदार, अनिल जोशी, डॉ. शंतुनू अभ्यंकर, संजय पुराणिक, मारुती भोसले, माधवी गांधी यांच्यासह सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते उपस्थितहोते. (प्रतिनिधी)