शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गद्दारी केली म्हणून साथीदाराकडूनच गेम

By admin | Updated: February 12, 2017 22:28 IST

गुंड अभिजीत खून प्रकरण : राऊतवाडीतील एकास अटक; मद्यप्राशनानंतर केले कोयत्याने वार

कऱ्हाड : साताऱ्यातील तडीपार गुंडाच्या खुनात पोलिसांनी त्याच्याच एका साथीदाराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्ह्यातील सहभागाची पोलिसांना माहिती देऊन तुरुंगात अडकवलं व चोरीच्या मुद्देमालात योग्य वाटणी दिली नाही, या कारणावरून आपण हा ‘गेम’ केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपीला गजाआड केले. अमोल बाबूराव पोळ (वय २८, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. शहरानजीक बनवडी येथे अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) याचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. अभिजित ऊर्फ नान्या हा सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी असून, तब्बल ४७ गुन्हे नोंद होते. काही दिवसांपूर्वीच त्याला साताऱ्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार कॉलनीत वास्तव्यास आला. त्याठिकाणी त्याने एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला. राहण्यास आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नान्या एकटाच त्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत होता. दरम्यान, शनिवारी दुपारी इमारतीचा सुरक्षारक्षक आधारकार्डची झेरॉक्स आणण्यासाठी गेला असताना नान्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. अभिजित ऊर्फ नान्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याचा दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराने खून केल्याची शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच नान्याचा साथीदार अमोल पोळ याची माहिती पोलिसांना मिळाली. अमोल पोळ व नान्या या दोघांनी एकत्रितपणे दहापेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा पोळवरील संशय बळावला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने तातडीने पोळचा शोध सुरू केला. शनिवारी रात्रीच त्याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. नान्या व अमोल पोळने यापूर्वी जे गुन्हे केले होते, त्या गुन्ह्यात चोरून आणलेल्या ऐवजातील योग्य वाटणी नान्याने अमोलला दिली नव्हती. या गद्दारीमुळे त्याचा त्याच्यावर राग होता. तसेच यापूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात नान्याला अटक झाली होती. त्यावेळी पोलिस तपासात नान्याने अमोलचे नाव घेतले. त्यामुळे अमोललाही अटक झाली. नान्यामुळेच आपल्याला तुरुंगात जावे लागले. तसेच त्याने जामिनासाठीही आपल्याला मदत केली नाही, याचाही राग अमोलच्या डोक्यात होता. याच रागातून त्याने शुक्रवारी रात्री शस्त्राने वार करून नान्याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमोल पोळ याला कऱ्हाड शहर पोलिसांच्या ताब्यात दिली असून, कऱ्हाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.