शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर कप’मधील विजेत्यांचा उद्या बालेवाडीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 16:47 IST

सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देअंतिम स्पर्धेत साताºयातील पाच गावे निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक

सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरवर्षी राज्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. या गावांना दुष्काळातून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे.

या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकविण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा, यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते.

स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित केल्या जाणाºया तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षीस ५० लाख रुपये आहे. दुसरे बक्षीस ३० लाख आणि तिसरे बक्षीस २० लाख रुपये आहे. तसेच याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला रोख बक्षीस दिले जाणार आहे.वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असणार आहे. 

पुण्यातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमीर खान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ होणार आहे.

स्पर्धेतील अंतिम १२ गावे...

सातारा जिल्हा : बिदाल, अनभुलेवाडी, भोसरे, यलमरवाडी, पवारवाडी

सांगली जिल्हा : शेरेवाडी, कानकात्रेवाडी

बीड जिल्हा : पळसखेडा, जायभाईवाडी

औरंगाबाद जिल्हा : गोळेगाव

वर्धा जिल्हा : काकडदरा

अकोला जिल्हा : जितापूर