शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर कप’मधील विजेत्यांचा उद्या बालेवाडीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 16:47 IST

सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देअंतिम स्पर्धेत साताºयातील पाच गावे निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक

सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरवर्षी राज्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. या गावांना दुष्काळातून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे.

या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकविण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा, यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते.

स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित केल्या जाणाºया तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षीस ५० लाख रुपये आहे. दुसरे बक्षीस ३० लाख आणि तिसरे बक्षीस २० लाख रुपये आहे. तसेच याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला रोख बक्षीस दिले जाणार आहे.वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असणार आहे. 

पुण्यातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमीर खान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ होणार आहे.

स्पर्धेतील अंतिम १२ गावे...

सातारा जिल्हा : बिदाल, अनभुलेवाडी, भोसरे, यलमरवाडी, पवारवाडी

सांगली जिल्हा : शेरेवाडी, कानकात्रेवाडी

बीड जिल्हा : पळसखेडा, जायभाईवाडी

औरंगाबाद जिल्हा : गोळेगाव

वर्धा जिल्हा : काकडदरा

अकोला जिल्हा : जितापूर