शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘वॉटर कप’मधील विजेत्यांचा उद्या बालेवाडीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 16:47 IST

सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देअंतिम स्पर्धेत साताºयातील पाच गावे निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक

सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरवर्षी राज्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. या गावांना दुष्काळातून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे.

या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकविण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा, यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते.

स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित केल्या जाणाºया तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षीस ५० लाख रुपये आहे. दुसरे बक्षीस ३० लाख आणि तिसरे बक्षीस २० लाख रुपये आहे. तसेच याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला रोख बक्षीस दिले जाणार आहे.वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असणार आहे. 

पुण्यातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमीर खान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ होणार आहे.

स्पर्धेतील अंतिम १२ गावे...

सातारा जिल्हा : बिदाल, अनभुलेवाडी, भोसरे, यलमरवाडी, पवारवाडी

सांगली जिल्हा : शेरेवाडी, कानकात्रेवाडी

बीड जिल्हा : पळसखेडा, जायभाईवाडी

औरंगाबाद जिल्हा : गोळेगाव

वर्धा जिल्हा : काकडदरा

अकोला जिल्हा : जितापूर