शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

धनगर समाजाचे गजीनृत्य आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:01 IST

कºहाड : आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख करावा, आदी मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर गजीनृत्य करत मोर्चा काढण्यात आला.यावेळी समाजबांधवांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले. आक्रमक ...

कºहाड : आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख करावा, आदी मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर गजीनृत्य करत मोर्चा काढण्यात आला.यावेळी समाजबांधवांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले. आक्रमक झालेल्या धनगर समाजबांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपवर हल्लाबोल करीत येथील कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ‘एक धनगर कोट धनगर, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, येळकोट येळकोट जय मल्हार, धनगड दाखवा नाहीतर शिफारस पाठवा, एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा गगनभेदी घोषणा देत मंगळवारी धनगर समाजबांधवांनी कºहाडात मोर्चा काढला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव व महिलाही सहभागी झाल्या होत्या.धनगर ऐवजी धनगड जात निर्माण करून केंद्रशासनाला खोटी माहिती दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचा तर बारामती येथे धनगर समाज बांधवांनी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा आम्ही सत्तेवर आल्यावर पहिल्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्न निकाली लावू म्हणणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांचाही तीव्र निषेध समाजबांधवांनी नोंदविला.यावेळी धनगर समाजबांधव येथील कोल्हापूर नाक्यापासून दत्तचौक याठिकाणी आले. येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या ठिकाणी समाजबांधवांनी गजीनृत्य केले. त्यानंतर पुन्हा समाजबांधव तालुका पोलीस स्टेशनमार्गे भेदा चौकातून तहसील कार्यालय येथे गेले.यावेळी आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजीराव गावडे, रमेश लवटे, भाऊसाहेब देवे, नितीन पुकळे, जयश्री लाडे, मंगल गलांडे, भगवान येडगे, आबासाहेब गावडे, रामझोरे, विलास पोळ, तेजस्विनीमेटकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.येळकोट येळकोट जय मल्हार.....कºहाड येथे आरक्षण मागणीसाठी काढलेल्या मोर्चाच धनगर समाजातील काही समाजबांधव त्यांच्या मूळच्या पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. कपाळाला भंडारा लावून येळकोट येळकोट जय मल्हार... असा जयघोष करीत शहरातून समाजबांधवांनी ढोल वाजवत व गजीनृत्य करीत कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास सुरुवात केली.७२ वर्षांपासूनप्रलंबित प्रश्न...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. फक्त त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. ही मागणी गेली ७२ वर्षांपासून समाजाची आहे. या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी कºहाडात गजीनृत्य करीत मोर्चा काढला.