शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

जिल्ह््याच्या विकासासाठी खच्चून निधी आणणार

By admin | Updated: January 29, 2015 23:29 IST

विजय शिवतारे : २५० कोटींच्या आराखड्याची सदस्यांची मागणी

सातारा : ‘जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही निधी लागेल, तो निधी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आणणार आहे. यात मी कुठेही कमी पडणार नाही. गेल्या वर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा मंजूर झाला होता. आताही २५० कोटींच्या वर जिल्ह्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी बहुतांश नियोजन समितीच्या सदस्यांनी केली असून, जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी कटिबध्द आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आायोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण विकासकामे राबवायची आहेत. पहिल्याच बैठकीत नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी चांगले सहकार्य केले. जिल्ह्याच्या विकासासाठी विरोधकांनाही सोबत घेणार आहे. कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नसतो, तर तो जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, हे मी दाखवून देणार आहे. गेल्यावर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा होता. राज्यस्तरावरील बैठकांमध्ये यापेक्षा जादा निधी शासनाला मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीसाठी राज्य शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी दहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या आॅडिटोरिअम हॉलसाठी लागणार आहे. या कामासाठी एकूण वीस कोटी रुपये लागणार असल्याने डीपीडीसीच्या नियमानुसार हा निधी देता येणार नसला तरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाच कोटींचा निधी मिळविणार आहे. यासाठी आमदार, खासदारांना सोबत घेऊन बैठक घेणार आहे. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठीही वाढीव निधी आणणार आहे.’खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार जिल्हा क्रीडा संकुलाच्या गुणवत्तेची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. येथील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली आहे. क्रीडासंकुल बांधल्यानंतर गॅरंटीच्या काळात ते खराब झाले असेल, तर संबंधित ठेकेदाराकडून त्याचे काम करून घेतले जाईल. मात्र, त्याआधी ४४ लाख रुपये खर्चून बॅडमिंटन कोर्टचे काम हाती घेण्यात येईल. टंचाईची बैठक येत्या पंधरा दिवसांत बोलावणार असून, डिपीडीसीच्या सर्व कामांची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या बैठकीत शिवसेनेचे धोरण काय असणार, या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढविणार आहोत. सहकारामध्ये पक्षाचा विचारच येत नाही. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत. यातून कितपत यश मिळेल, हे मला माहीत नसले तरी सत्तेला चेक बसविण्याचे काम आम्ही करू.’ (प्रतिनिधी)