शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह््याच्या विकासासाठी खच्चून निधी आणणार

By admin | Updated: January 29, 2015 23:29 IST

विजय शिवतारे : २५० कोटींच्या आराखड्याची सदस्यांची मागणी

सातारा : ‘जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही निधी लागेल, तो निधी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आणणार आहे. यात मी कुठेही कमी पडणार नाही. गेल्या वर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा मंजूर झाला होता. आताही २५० कोटींच्या वर जिल्ह्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी बहुतांश नियोजन समितीच्या सदस्यांनी केली असून, जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी कटिबध्द आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आायोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण विकासकामे राबवायची आहेत. पहिल्याच बैठकीत नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी चांगले सहकार्य केले. जिल्ह्याच्या विकासासाठी विरोधकांनाही सोबत घेणार आहे. कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नसतो, तर तो जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, हे मी दाखवून देणार आहे. गेल्यावर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा होता. राज्यस्तरावरील बैठकांमध्ये यापेक्षा जादा निधी शासनाला मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीसाठी राज्य शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी दहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या आॅडिटोरिअम हॉलसाठी लागणार आहे. या कामासाठी एकूण वीस कोटी रुपये लागणार असल्याने डीपीडीसीच्या नियमानुसार हा निधी देता येणार नसला तरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाच कोटींचा निधी मिळविणार आहे. यासाठी आमदार, खासदारांना सोबत घेऊन बैठक घेणार आहे. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठीही वाढीव निधी आणणार आहे.’खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार जिल्हा क्रीडा संकुलाच्या गुणवत्तेची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. येथील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली आहे. क्रीडासंकुल बांधल्यानंतर गॅरंटीच्या काळात ते खराब झाले असेल, तर संबंधित ठेकेदाराकडून त्याचे काम करून घेतले जाईल. मात्र, त्याआधी ४४ लाख रुपये खर्चून बॅडमिंटन कोर्टचे काम हाती घेण्यात येईल. टंचाईची बैठक येत्या पंधरा दिवसांत बोलावणार असून, डिपीडीसीच्या सर्व कामांची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या बैठकीत शिवसेनेचे धोरण काय असणार, या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढविणार आहोत. सहकारामध्ये पक्षाचा विचारच येत नाही. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत. यातून कितपत यश मिळेल, हे मला माहीत नसले तरी सत्तेला चेक बसविण्याचे काम आम्ही करू.’ (प्रतिनिधी)