शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

कोरोनाचा प्रसार झाला असताना काहींना सुचते गंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा ...

सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे संदेश पाठवून समाजाची दिशाभूल केली जात असून, त्याबाबत अधिक दक्ष राहणे आणि सावधान राहणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने होत असताना लोकांची दिशाभूल करणारे अनेक महाभाग समाज माध्यमांवर गैरसमज पसरविणारे संदेश पाठवत आहेत. काही लोक विचार न करता ते पुढे पाठविताना दिसतात. रविवारी रात्रीपासून समाज माध्यमांवर ''सातारा जिल्ह्याच्या सीमा मध्यरात्रीपासून बंद'' असा ब्रेकिंग न्यूज टॅग लावून संदेश फिरतो आहे. वास्तविक, जिल्हाधिकार्‍यांनी असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत.

या संदेशामध्ये जिल्ह्यातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले आहे. हा संदेश अनेक वेळा समाज माध्यमांतून पुढे पुढे ढकलला गेल्याने लोकांमध्ये गैरसमज असल्याचे चित्र होते. लोक कुठलाही विचार न करता आपल्या मोबाईलवर पडलेला मेसेज पुढे पाठविण्याचे काम करतात. अधिकृत माध्यमातून असे मेसेज आले नाहीत किंवा वृत्तपत्रांमध्ये देखील याबाबत कोणतेही स्पष्टीकरण प्रशासनाने केलेली नाही. तरीदेखील केवळ माहिती मिळाली की ती पुढे पाठवायची या अंधश्रद्धाळू भावनेतून लोक आलेला मेसेज पुढे ढकलतात आणि समाजामध्ये गैरसमज पसरताना दिसतो.

कोरोना महामारीचा काळ सगळ्यांसाठीच काळजी घेण्याचा आहे. माणसाच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असलेला विषय काहीजण गमतीने घेत असल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील भीती काढून टाकणे तसेच ही व्याधी होऊ नये, यासाठी कोणती आदर्श जीवनशैली अंगीकारायची याबाबत संदेश पाठवून प्रशासनाला मदत करण्याऐवजी सर्वांचीच डोकेदुखी वाढविण्याचे काम हे संदेशवाहक करत आहेत.

कोट..

समाजमाध्यमांवर चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे संदेश पाठविले जात आहेत. लोकांनी सावध राहावे. आलेला मेसेज फॉरवर्ड करण्याआधी पूर्णपणे विचार करावा. सीमा बंदीचा निर्णय घेतलेला नाही. चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा