शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

कोरोनाचा प्रसार झाला असताना काहींना सुचते गंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा ...

सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे संदेश पाठवून समाजाची दिशाभूल केली जात असून, त्याबाबत अधिक दक्ष राहणे आणि सावधान राहणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने होत असताना लोकांची दिशाभूल करणारे अनेक महाभाग समाज माध्यमांवर गैरसमज पसरविणारे संदेश पाठवत आहेत. काही लोक विचार न करता ते पुढे पाठविताना दिसतात. रविवारी रात्रीपासून समाज माध्यमांवर ''सातारा जिल्ह्याच्या सीमा मध्यरात्रीपासून बंद'' असा ब्रेकिंग न्यूज टॅग लावून संदेश फिरतो आहे. वास्तविक, जिल्हाधिकार्‍यांनी असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत.

या संदेशामध्ये जिल्ह्यातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले आहे. हा संदेश अनेक वेळा समाज माध्यमांतून पुढे पुढे ढकलला गेल्याने लोकांमध्ये गैरसमज असल्याचे चित्र होते. लोक कुठलाही विचार न करता आपल्या मोबाईलवर पडलेला मेसेज पुढे पाठविण्याचे काम करतात. अधिकृत माध्यमातून असे मेसेज आले नाहीत किंवा वृत्तपत्रांमध्ये देखील याबाबत कोणतेही स्पष्टीकरण प्रशासनाने केलेली नाही. तरीदेखील केवळ माहिती मिळाली की ती पुढे पाठवायची या अंधश्रद्धाळू भावनेतून लोक आलेला मेसेज पुढे ढकलतात आणि समाजामध्ये गैरसमज पसरताना दिसतो.

कोरोना महामारीचा काळ सगळ्यांसाठीच काळजी घेण्याचा आहे. माणसाच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असलेला विषय काहीजण गमतीने घेत असल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील भीती काढून टाकणे तसेच ही व्याधी होऊ नये, यासाठी कोणती आदर्श जीवनशैली अंगीकारायची याबाबत संदेश पाठवून प्रशासनाला मदत करण्याऐवजी सर्वांचीच डोकेदुखी वाढविण्याचे काम हे संदेशवाहक करत आहेत.

कोट..

समाजमाध्यमांवर चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे संदेश पाठविले जात आहेत. लोकांनी सावध राहावे. आलेला मेसेज फॉरवर्ड करण्याआधी पूर्णपणे विचार करावा. सीमा बंदीचा निर्णय घेतलेला नाही. चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा