शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कोरोनाचा प्रसार झाला असताना काहींना सुचते गंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा ...

सातारा : कोरोना महामारीचा दिवसेंदिवस विळखा आणखी तीव्र करत असताना काही सडक्या बुद्धीच्या लोकांना गंमत सुचत आहे. समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे संदेश पाठवून समाजाची दिशाभूल केली जात असून, त्याबाबत अधिक दक्ष राहणे आणि सावधान राहणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने होत असताना लोकांची दिशाभूल करणारे अनेक महाभाग समाज माध्यमांवर गैरसमज पसरविणारे संदेश पाठवत आहेत. काही लोक विचार न करता ते पुढे पाठविताना दिसतात. रविवारी रात्रीपासून समाज माध्यमांवर ''सातारा जिल्ह्याच्या सीमा मध्यरात्रीपासून बंद'' असा ब्रेकिंग न्यूज टॅग लावून संदेश फिरतो आहे. वास्तविक, जिल्हाधिकार्‍यांनी असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत.

या संदेशामध्ये जिल्ह्यातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे म्हटले आहे. हा संदेश अनेक वेळा समाज माध्यमांतून पुढे पुढे ढकलला गेल्याने लोकांमध्ये गैरसमज असल्याचे चित्र होते. लोक कुठलाही विचार न करता आपल्या मोबाईलवर पडलेला मेसेज पुढे पाठविण्याचे काम करतात. अधिकृत माध्यमातून असे मेसेज आले नाहीत किंवा वृत्तपत्रांमध्ये देखील याबाबत कोणतेही स्पष्टीकरण प्रशासनाने केलेली नाही. तरीदेखील केवळ माहिती मिळाली की ती पुढे पाठवायची या अंधश्रद्धाळू भावनेतून लोक आलेला मेसेज पुढे ढकलतात आणि समाजामध्ये गैरसमज पसरताना दिसतो.

कोरोना महामारीचा काळ सगळ्यांसाठीच काळजी घेण्याचा आहे. माणसाच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असलेला विषय काहीजण गमतीने घेत असल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील भीती काढून टाकणे तसेच ही व्याधी होऊ नये, यासाठी कोणती आदर्श जीवनशैली अंगीकारायची याबाबत संदेश पाठवून प्रशासनाला मदत करण्याऐवजी सर्वांचीच डोकेदुखी वाढविण्याचे काम हे संदेशवाहक करत आहेत.

कोट..

समाजमाध्यमांवर चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे संदेश पाठविले जात आहेत. लोकांनी सावध राहावे. आलेला मेसेज फॉरवर्ड करण्याआधी पूर्णपणे विचार करावा. सीमा बंदीचा निर्णय घेतलेला नाही. चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा