शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अधिकाऱ्यांसमोर दहा सेकंदात टोलनाका ओलांडून गेली वाहने

By admin | Updated: December 11, 2015 00:53 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाहणी : खाद्य-भाजीविक्रेत्यांना मज्जाव

सायगाव : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या आदेशाने आनेवाडी टोलनाका येथे अंमलबजावणी होते आहे का? याच्या तपासणीसाठी सोमवारपासून महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी आनेवाडी टोलनाक्याची पाहणी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या या पाहण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, चक्क दहा सेकंदात गाडी टोलनाका पार करत असल्याचे चित्र या अधिकाऱ्यांनी अनुभवलं.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी टोलनाक्यावरून १० सेकंदात वाहने पुढे गेली पाहिजेत, असे आदेश टोल प्रशासनाला दिले होते. त्याची तपासणी करण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार रणजित देसाई, मंडल अधिकारी व्ही. डी. गायकवाड, तलाठी, पोलीस प्रशासन यांनी तासभर पाहणी करून किती वेळात वाहने जातात याची नोंद केली. त्याचबरोबर टोलनाक्यावरील सोयी सुविधांची पाहणी केली व प्रशासनाला यावेळी रिलायन्स कंपनी व टोल प्रशासनाने अधिकाऱ्यांना वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली.यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत अधिकाऱ्यांनी सातारा ते पुणे बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या नोंदी घेऊन संध्याकाळी पुन्हा पुणे ते सातारा जाणाऱ्या मार्गावरील वाहनांच्या किती वेळामध्ये टोलनाका पास करतात. याची नोंद घेऊन पुढील शनिवार व रविवारी अशा प्रकारची पाहणी होणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर टोलप्रशासनाला त्यांच्या त्रूटी दाखवून त्यामध्ये सुधारणा करावयास सांगितले. या टोल पाहणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले.या पाहणीवेळी संपूर्ण महसूल प्रशासन यावेळी टोलनाक्यावर हजर असल्याने टोलनाक्याला शासकीय कार्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सातारा पोलीस, भुर्इंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, वाहने लवकर सुटत असल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. विक्रेत्यांना मज्जावटोलनाक्यावर महसूल अधिकाऱ्यांची पाहणी असल्याने दिवसभर स्ट्रॉबेरी, पाणी, भाजीपाला तसेच इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांस याठिकाणी टोलप्रशासनाद्वारे मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे टोलनाक्यावर खाद्य विक्रीवर बंधने येणार का? टोलनाक्यावर सुरू असलेला रोजगार कायमचा संपणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले.